या प्रकरणात अजित पवार यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करुन दबाव आणला होता, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. यावर उत्तर देताना अजित पवारांनी म्हटले की, मी सीपींना वर्षभर काही ना काही कारणासाठी फोन करत असतो. पुण्यातील अपघातानंतर मी त्यांना फोन करुन दोषींवर योग्य ती कारवाई करा, असे सांगितले. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून हे सांगणं माझं काम आहे, असे अजित पवार यांनी म्हटले. पण याप्रकरणात काहीजण माझ्यावरच घसरले, असा टोला अजितदादांनी अंजली दमानिया यांना लगावला.