ते आहेत म्हणून तुम्ही आहात, ते आहेत म्हणून हिंदुस्थान आहे: अक्षय कुमार
अक्षयचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच शेअर होतो आहे. अवघ्या एक तासात हा व्हिडिओ 21 हजाराहून जास्त शेअर झाला आहे.
'त्या जवानांचे कुटुंबीय आणि आपल्या देशातील हजारो सैनिकांच्या कुटुंबीयांना याची चिंता आहे का? की कोणता सिनेमा प्रदर्शित होणार आहे किंवा कोणत्या कलाकाराला बॅन केलं जाणार? नाही… त्यांना फक्त एकच काळजी आहे. ती म्हणजे त्यांच्या भविष्याची… आणि आपली चिंता असली पाहिजे कि त्यांचं वर्तमान आणि भविष्य चांगलं असलं पाहिजे आहे. त्यामुळे ते आहेत तर मी आहे… ते आहेत म्हणून तुम्ही आहात… आणि ते नसतील तर हिंदुस्थान नसेल… जयहिंद!’
'अरे जरा शरम वाटू द्या… ही चर्चा नंतर करा. पहिले हा विचार करा की, कुणीतरी सीमेवर आपले प्राण दिले आहेत. 19 जवान उरी दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले आहेत. तर एक 24 वर्षाचा जवान नितीन यादव बारामुलामध्ये शहीद झाला आहे.'
अनेक दिवसांपासून मी पाहतो आहे की, मीडियामधून आपलेच लोक आपल्याच लोकांशी तावातावानं चर्चा करीत आहे. कोणी सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत आहे, तर कुणी कलाकारांवर बंदी घालण्याची मागणी करत आहे, तर कुणाला भीती वाटते की युद्ध होईल की काय?'
या व्हिडिओमध्ये अक्षय म्हणतो की, 'आज मी तुमच्याशी एक स्टार किंवा सेलिब्रिटी म्हणून बोलत नाही. तर मी तुमच्याशी बोलतोय ते एका सैनिकाच्या मुलाप्रमाणे.
अक्षयनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यानं म्हटलं आहे की, ‘मागील काही दिवसांपासून माझ्या मनात याविषयी विचार सुरु आहे आणि आज ते मी व्यक्त करतो. त्यामुळे कुणाचाही अपमान करणाचा माझा हेतू नाही…’
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी सर्जिकल स्ट्राईकबाबत पुरावे मागितले तेव्हापासून देशभरात याबाबत चर्चा सुरु झाली आहे. कुणी या वक्तव्याचा निषेध केला तर कुणी त्याचं समर्थन. याच दरम्यान, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार या संपूर्ण चर्चेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.