परिवर्तन रॅली : पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे
इतर पक्षांसाठी ही निवडणूक सत्ता मिळवण्याचा प्रयत्न असेल, पण भाजपसाठी 2017 ची निवडणूक एक जबाबदारी आहे : पंतप्रधान मोदी
वढ्या मोठ्या सभेला संबोधित करण्याचं सौभाग्य मला आयुष्यात कधीही मिळालं नव्हतं : पंतप्रधान मोदी
लखनऊ : आपल्या स्वार्थासाठी जनतेला दावणीला बांधणाऱ्या पक्षांना धडा शिकवा, असं आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला.
निवडणुकीच्या निकालात काय होईल, हे रॅलीतील गर्दीच सांगत आहे : पंतप्रधान मोदी
लखनऊ ही अटल बिहारी वाजपेयींची कर्मभूमी आहे, टीव्हीवर ही दृश्यं पाहून अटलजींना अतिशय आनंद होईल : पंतप्रधान मोदी
30 वर्षांनंतर देशाला असं सरकार मिळालं, ज्याची हायकमांड फक्त सव्वाशे कोटी जनता आहे : पंतप्रधान मोदी
उत्तर प्रदेशमध्ये 14 वर्षांपासून विकासाचा वनवास आहे : पंतप्रधान मोदी
केंद्राचा पैसा योग्य पद्धतीने खर्च झाला असता, तर उत्तर प्रदेशचा आज कायापालट झाला असता : पंतप्रधान मोदी
दोन पक्षांमधील राजकारण आम्ही समजू शकतो. पण उत्तर प्रदेशच्या जनतेसोबत राजकारण होऊ नये : पंतप्रधान मोदी
एरव्ही कधीही एकमत न होणारे पक्ष नोटाबंदी होताच सरकारविरोधात एकवटले आहेत, असं म्हणत मोदींनी समाजवादी पक्ष, बसपावर तिखट प्रहार केला. इतकंच नाही, तर या सभेतून मोदींनी काँग्रेसचाही समाचार घेतला.