अस्तित्वासाठी झगडतंय शहीदांचं गाव!
एबीपी माझा वेब टीम | 27 Sep 2016 09:40 AM (IST)
1
स्थानिकांनी प्रशासनाला याबाबत नेहमीच माहिती दिली, तक्रार केली. मात्र, प्रशासनाने कायमच दुर्लक्ष केलं.
2
शेरपूर गावाला शहीदांचं गाव म्हटलं जात. मात्र, या गावाची आजची स्थिती अत्यंत दयनीय आहे.
3
उत्तर प्रदेशमधील गाजीपूर जिल्ह्यात गंगा नदीच्या पुराचा फटका शहीदांचं गाव म्हणून ओळख असणाऱ्या शेरपूरला बसला आहे. या गावात भारताच्या गौरवशाली इतिहासाच्या खुणा आहेत. अभिमान वाटावा असा या गावाचा इतिहास आहे.
4
शेरपूरला पुराचा फटका बसला आणि त्यानंतर भूस्खलनामुळे स्थानिकांचं जगणं मुश्किल होऊन बसलं आहे.
5
आपलं अस्तित्त्व कायम राखण्यासाठी शेरपूर झगडताना दिसतंय.
6
भूस्खलनामुळे शेरपूरला मोठा फटका बसला आहे. शेरपूर पंचक्रोशीत 65 हजार लोकसंख्या आहे. 27 हजार मतदार असलेल्या या पंचक्रोशीत 15 प्राथमिक शाळा, 1 माध्यमिक शाळा आणि 1 कॉलेज आहे.