अस्तित्वासाठी झगडतंय शहीदांचं गाव!

उत्तर प्रदेशमधील गाजीपूर जिल्ह्यात गंगा नदीच्या पुराचा फटका शहीदांचं गाव म्हणून ओळख असणाऱ्या शेरपूरला बसला आहे. या गावात भारताच्या गौरवशाली इतिहासाच्या खुणा आहेत. अभिमान वाटावा असा या गावाचा इतिहास आहे.
स्थानिकांनी प्रशासनाला याबाबत नेहमीच माहिती दिली, तक्रार केली. मात्र, प्रशासनाने कायमच दुर्लक्ष केलं.
शेरपूर गावाला शहीदांचं गाव म्हटलं जात. मात्र, या गावाची आजची स्थिती अत्यंत दयनीय आहे.
उत्तर प्रदेशमधील गाजीपूर जिल्ह्यात गंगा नदीच्या पुराचा फटका शहीदांचं गाव म्हणून ओळख असणाऱ्या शेरपूरला बसला आहे. या गावात भारताच्या गौरवशाली इतिहासाच्या खुणा आहेत. अभिमान वाटावा असा या गावाचा इतिहास आहे.
शेरपूरला पुराचा फटका बसला आणि त्यानंतर भूस्खलनामुळे स्थानिकांचं जगणं मुश्किल होऊन बसलं आहे.
आपलं अस्तित्त्व कायम राखण्यासाठी शेरपूर झगडताना दिसतंय.
भूस्खलनामुळे शेरपूरला मोठा फटका बसला आहे. शेरपूर पंचक्रोशीत 65 हजार लोकसंख्या आहे. 27 हजार मतदार असलेल्या या पंचक्रोशीत 15 प्राथमिक शाळा, 1 माध्यमिक शाळा आणि 1 कॉलेज आहे.