क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर राजकीय आखाड्यात उतरलेले भारताय खेळाडू
भारताचा माजी खेळाडू विनोद कांबळीने देखील क्रिकेटनंतर राजकीय मैदानात आपलं नशीब आजमावलं होतं. मात्र त्याला यश मिळवता आलं नाही. विनोद कांबळीने लोक भारती पार्टीमधून 2009 साली विधानसभा निवडणूक लढवली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाजी किक्रेटर नवज्योत सिंग सिद्धू यांनीही क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात प्रवेश केला होता. 2004 मध्ये सिद्धू भाजपमध्ये सहभागी झाले होते. मात्र त्यानंतर 2017 मध्ये सिद्धू यांनी काँग्रेसचा हात धरला.
भारताचा माजी जलद गोलंदाज प्रविण कुमारने क्रिकेटमधून निवृत्तीनंतर समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला.
भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने 2009 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 2009 मध्ये अझरुद्दीनने लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मंसूर अली खान पतौडी यांनी 1971 मध्ये राव बीरेंद्र सिंह यांच्या नेतृत्त्वात विशाल हरियाणा पार्टीकडून निवडणूक लढली होती. मात्र त्यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांना 1991 मध्ये काँग्रेसकडून भोपाळमधून निवडणूक लढवली, मात्र तिथेही त्यांना यश मिळालं नाही.
1983 मध्ये वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघातील सदस्य किर्ती आजाद यांनी 2014 मध्ये बिहारमधून काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली आणि खासदार बनले.
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गंभीरने अरुण जेटली आणि रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -