✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

पहिल्याच कसोटीत सामनावीर ठरलेले भारतीय क्रिकेटपटू

एबीपी माझा वेब टीम   |  07 Oct 2018 10:16 AM (IST)
1

भारताचा सध्याचा स्फोटक खेळाडू रोहित शर्माचा सध्या कसोटी संघात समावेश नाही, मात्र रोहितची सुरुवातही धमाकेदार होती. रोहितने सचिनच्या शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजविरोधात 177 धावांची खेळी केली होती. या खेळीमुळे रोहितला पहिल्याच सामन्यात सामनावीर म्हणून निवडण्यात आलं होतं.

2

भारताचा सलामीवर शिखर धवनही पहिल्याच सामन्यात सामनावीर ठरला होता. शिखरने 2013मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात 187 धावांची खेळी केली होती.

3

आमरेनंतर जलद गोलंदाज आरपी सिंहने 2006मध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिल्याच सामन्यात पाच विकेट घेत सामनावीर पुरस्कारावर आपलं नाव कोरलं होतं.

4

आरपी सिंहनंतर रविचंद्रन अश्विनने 2011मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्याच सामन्यात 6 विकेट घेतल्या होत्या. या सामन्यात अश्विन सामनावीर ठरला होता.

5

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 18 वर्षीय पृथ्वी शॉने दमदार प्रदर्शनाने सर्वांची मनं जिंकली. पहिल्याच सामन्यात 134 धावा धावांची शतकी खेळी करणारा पृथ्वी सामनावीर ठरला. पहिल्याच सामन्यात सामनावीर ठरणारा पृथ्वी भारताचा सहावा खेळाडू ठरला आहे.

6

याशिवाय 18 वर्ष 329 दिवसांचा पृथ्वी पहिल्याच सामन्यात सामनावीर ठरलेला भारताचा तिसरा युवा खेळाडू आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर भारताकडून सर्वात कमी वयात म्हणजे 17व्या वर्षी सामनावीर ठरला होता.

7

भारताचा सध्याचा स्फोटक खेळाडू रोहित शर्माचा सध्या कसोटी संघात समावेश नाही, मात्र रोहितची सुरुवातही धमाकेदार होती. रोहितने सचिनच्या शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजविरोधात 177 धावांची खेळी केली होती. या खेळीमुळे रोहितला पहिल्याच सामन्यात सामनावीर म्हणून निवडण्यात आलं होतं.

8

भारताकडून प्रविण आमरेंनी 1992 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्याच सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकावला होता. त्यावेळी आमरेंनी 103 धावांची खेळी केली होती.

9

वेस्टइंडिज विरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी टीम इंडियाने वेस्टइंडिजला 272 धावा आणि एका डावाने धुळ चारली. कसोटी सामन्यामध्ये भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. याआधी भारतानं यावर्षी जून महिन्यात अफगाणिस्तानचा एक डाव आणि 262 धावांनी पराभव केला होता.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • पहिल्याच कसोटीत सामनावीर ठरलेले भारतीय क्रिकेटपटू
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.