घाटकोपरमध्ये बिनपावसाचा महापूर, पाईपलाईन फुटली
अनेकांच्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत.
मात्र ही पाईपलाईन फुटल्याने पुढील तीन ते चार दिवस या परिसरातील नागरिकांना पाणी कपातीच्या संकटाला सामोरं जावं लागू शकतं.
मुंबईच्या घाटकोपरमधील असल्फा परिसरात पाईपलाईन फुटल्यामुळे अक्षरशः नदीच्या प्रवाहाप्रमाणं लाखो लीटर पाणी वाया गेलं आहे.
अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत, अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं.
पाईपलाईन फुटली तेव्हा जोरात आवाज झाला. पाण्याचा प्रवाह एवढा जबरदस्त होता की 40 ते 50 फुट उंच पाण्याचे फवारे उडत होते.
फुटलेल्या पाईपलाईनचा व्हॉल्व जोडण्यात आता यश आलं असलं तरी ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे.
काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी घटनास्थळाला भेट देऊन याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
घाटकोपरमध्ये बुधवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
त्यामुळे परिसरात सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. लोकांच्या घरातही पाणी शिरलं होतं.