मांजरा धरण : आधी आणि आता

लातूरला पाणी पुरवठा करणारं मांजरा धरण 90 टक्क्यांहून जास्त भरलं आहे. त्यामुळे पहाटे सहा वाजता सहा दरवाज्यांतून विसर्ग सुरु झाला.
दुष्काळामुळे लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची नामुष्की ओढवली होती.
90 टक्क्यांहून जास्त पाणी भरल्यामुळे मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत.
लातूरला पाणी पुरवठा करणारं मांजरा धरण 90 टक्क्यांहून जास्त भरलं आहे. त्यामुळे पहाटे सहा वाजता सहा दरवाज्यांतून विसर्ग सुरु झाला.
तुडुंब झालेल्या मांजरा धरणामुळे लातूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. सततच्या पावसामुळे मांजरा धरणातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली.
धरणानजीक असलेल्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
लातूरसह, बीड आणि उस्मानाबादला देखील मांजरा धरणातून पाणी पुरवठा केला जातो.
आता मांजरा धरण तुडुंब भरल्याने लातूरसह उस्मानाबाद आणि बीडचाही पाणीप्रश्न मिटला आहे.