मुंबईकरांनी पोसलेला प्लास्टिकचा भस्मासूर
महत्त्वाचं म्हणजे मुंबईकरांनी स्वतःहून प्लास्टिक बंदीचा पण केला पाहिजे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईला प्लॅस्टिकमुक्त करायचं असेल तर फक्त नियम करून चालणार नाहीत. तर त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी देखील होणं गरजेचं आहे.
29 ऑगस्टला प्रत्यक्षात मुंबई तुंबवली ती, मुंबईकरांनीच पोसलेल्या प्लॅस्टिकच्या भस्मासूरानं. 30 ऑगस्टला मुंबई महापालिकेनं अनेक टन प्लास्टिकचा कचरा गोळा केला आहे.
मुंबई महापालिकेच्या हद्दीत 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर आधीपासूनच बंदी आहे. मात्र, ही बंदी फक्त कागदोपत्री असल्याचं उघड झालं आहे.
मुंबईतून प्लास्टीक हद्दपार करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे आणि त्याची सुरुवात महापालिकेच्या भाजी मंडईपासून केली जाणार आहे.
29 ऑगस्टला मुंबईत तुंबलेल्या पाण्याला प्लास्टिक पिशव्या जबाबदार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर मुंबई महापालिकेला आता जाग आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -