एसआरपीएफ जवानांकडून अंबरनाथमधील गावाची स्वच्छता
ग्रामस्थ आणि जवानांनी यावेळी स्वच्छतेची शपथही घेतली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात राखीव दलाच्या पोलिसांनी स्वच्छता अभियान राबवलं.
अंबरनाथ तालुक्यात तळोजा रोडवर असलेलं नाऱ्हेण गाव राज्य राखीव दलाच्या बाळेगाव तुकडीने दत्तक घेतलं.
या तुकडीच्या वतीनं या गावात नेहमी प्रबोधनात्मक आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असतात.
अभियानात राज्य राखीव दलाचे सुमारे 550 जवान सहभागी झाले होते. शिवाय नाऱ्हेण गावातले ग्रामस्थ, स्त्रिया, लहान मुलं यांचाही सहभाग मोठा होता.
गावातले रस्ते, शाळेचा परिसर, निवासी भाग या परिसरात स्वच्छता करून गाव स्वच्छ केलं.
गांधी जयंतीनिमित्त देशभरात स्वच्छता अभियान सुरू आहे. यात राज्य राखीव पोलीस दलाचे जवानही सहभागी झाले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -