आकाशातून पाहा जमिनीवरच्या वाहतूक कोंडीची दृश्यं!

(फोटो सौजन्य: दीपक पळसुले, एबीपी माझा, भिवंडी)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईतल्या प्रमुख महामार्गवरही वाहतूक कोंडी झाली होती. (फोटो सौजन्य: दीपक पळसुले, एबीपी माझा, भिवंडी)

मुंबईतही लिंक रोड, एलबीएस मार्ग, एसव्ही रोड या अंतर्गत रस्त्यांवरही जागोजागी वाहतुकीची कोंडी झाली होती. (फोटो सौजन्य: दीपक पळसुले, एबीपी माझा, भिवंडी)
पायपीटीनंतर डॉ. दीपक सावंत यांनी खारेगाव टोलनाक्यावर दुपारी चारपर्यंत टोलमुक्ती देण्याची घोषणा केली होती. (फोटो सौजन्य: दीपक पळसुले, एबीपी माझा, भिवंडी)
मुंबई-अहमदाबादला जोडणारा वर्सोवा पूल बंद पडल्यानं शिळफाटा परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. याचा फटका राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनाही बसला होता. दीपक सावंत ट्रॅफिकमध्ये अडकले होते. त्यामुळे शेवटी वैतागून त्यांनी चालत जाणं पसंत केलं. दोन किलोमीटरपर्यंत आरोग्यमंत्री चालत गेले होते. (फोटो सौजन्य: दीपक पळसुले, एबीपी माझा, भिवंडी)
ठाणे, भिवंडी, शिळफाटा, तसंच घोडबंदरमध्ये वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. दोन आठवड्यांसाठी वर्सोवा पूल बंद करण्यात आल्यानं जवळपास वाहनांच्या 20 किमीपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. (फोटो सौजन्य: दीपक पळसुले, एबीपी माझा, भिवंडी)
मुंबई-अहमदाबादला जोडणारा वर्सोवा पूल बंद असल्यानं मोठ्या गाड्यांची वाहतूक ही विविध मार्गे वळवण्यात आली होती. (फोटो सौजन्य: दीपक पळसुले, एबीपी माझा, भिवंडी)
ड्रोन कॅमेऱ्यानं ही दृश्य टिपण्यात आली आहेत. (फोटो सौजन्य: दीपक पळसुले, एबीपी माझा, भिवंडी)
ठाणे-भिवंडी रोडवरची नेमकी स्थिती काय आहे हे 'एबीपी माझा'नं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. (फोटो सौजन्य: दीपक पळसुले, एबीपी माझा, भिवंडी)
थेट आकाशातून या वाहतूक कोंडीची दृश्य टिपण्यात आली आहेत. (फोटो सौजन्य: दीपक पळसुले, एबीपी माझा, भिवंडी)
महामार्गावर बऱ्याचदा अशी परिस्थिती पाहायला मिळते. (फोटो सौजन्य: दीपक पळसुले, एबीपी माझा, भिवंडी)
महामार्गावरील गेल्या ३ दिवसांपासून महाकोंडीनं चाकरमान्यांच्या नाकी दम आणला आहे. (फोटो सौजन्य: दीपक पळसुले, एबीपी माझा, भिवंडी)
ठाणे-भिवंडी हायवेनं मुंबईकरांच्या तोंडचं अक्षरश: पाणी पळवलं आहे. (फोटो सौजन्य: दीपक पळसुले, एबीपी माझा, भिवंडी)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -