बालाकोट एअर स्ट्राईकची संपूर्ण कहाणी साड्यांवर
कंपनीचे संचालक म्हणाले, साडीबाबत लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. देशभरातून साडीसाठी मागणी होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकंपनीचे संचालक मनीष म्हणाले की, या साडीद्वारे आम्ही भारतीय जवानांच्या शौर्याचे कौतुक करण्याचा प्रयत्न करत आहोत.
या साडीवर जवानांची ताकद, नवे रणगाडे, तेजस विमाने आणि अन्य शस्त्रसामग्री चित्रीत केली आहे.
साडी बनवणाऱ्या कंपनीने सांगितले की, या साड्यांमधून जो नफा मिळेल, तो शहीदांच्या कुटुंबीयांना देण्यात येईल.
जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. भारताने बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करुन या हल्ल्याचा बदला घेतला.
गुजरातमधील अन्नपूर्णा इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ही साडी बनवण्याचा कारनामा केला आहे.
26 फेब्रुवारी रोजी भारतीय वायु सेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या अड्ड्यांवर हवाई हल्ला केला. या हल्ल्याची कहाणी चित्र स्वरुपात आता साड्यांवर पाहायला मिळणार आहे. (सर्व फोटो : एएनआय आणि ट्विटर व्हिडीओ)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -