T20 Cricket : जाणून घ्या, कर्णधारपदी कोहली असताना भारताचा सक्सेस रेट...
एम.एस. धोनीनंतर विराट कोहली भारताचा दुसरा सर्वात यशस्वी टी-20 कर्णधार आहे. (Photo tweeted by @imVkohli)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधोनीनं 2016 मध्ये टी-20 संघाचं नेतृत्वं सोडलं होतं. त्यानंतर टी-20 संघाचं कर्णधारपद विराट कोहलीकडे आलं. (Photo tweeted by @imVkohli)
आतापर्यंत विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघानं 50 आंतरराष्टीय टी20 सामने खेळले आहेत. यापैकी भारतीय संघानं 30 सामन्यात विजय मिळवला आहे. (Photo tweeted by @imVkohli)
भारताला 16 सामन्यात पराभवाचा धक्का बसलाय. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाचा सक्सेस रेट 64 टक्के इतका राहिला. (Photo tweeted by @imVkohli)
टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात कर्णधार म्हणून भारताकडून विराटच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. (Photo tweeted by @imVkohli)
तर जागतिक क्रिकेटमध्ये विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. 50 सामन्यातील 47 डावांत विराट कोहलीनं 47.57 च्या सरासरीनं 1570 धावा चोपल्या आहेत. (Photo tweeted by @imVkohli)
कर्णधारपदी असताना सर्वाधिक धावा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचच्या नावावर आहेत. (Photo tweeted by @imVkohli)
कर्णधार म्हणून विराट कोहलीची कामगिरी चांगली आहे. मात्र विराटला एकही आयसीसी चषक उंचावता आलेला नाही. 2017 चॅम्पियन ट्रॉफी, 2019 एकदिवसीय विश्वचषक, 2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन ट्रॉफी आणि टी20 विश्वचषकांमध्ये विराटला संधी होती. (Photo tweeted by @imVkohli)
मात्र, विराट आयसीसी चषक जिंकण्यात अपयशी ठरलाय. (Photo tweeted by @imVkohli)
नामिबियाविरुद्धच्या सामन्यानंतर ट्वेन्टी ट्वेन्टी कप्तान म्हणून विराटने शेवटची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तो म्हणाला, “एकत्रितपणे आम्ही आमचे ध्येय साध्य करण्यासाठी निघालो. दुर्दैवाने आम्ही कमी पडलो आणि एक संघ म्हणून आमच्यापेक्षा कोणीही जास्त निराश नाही. तुम्हा सर्वांकडून मिळालेला पाठिंबा अप्रतिम आहे आणि आम्ही त्यासाठी आभारी आहोत. आम्ही दमदार पुनरागमनासाठी पुन्हा एकदा सज्ज होऊ आणि आमचे सर्वोत्तम पाऊल टाकू. जय हिंद.” (Photo tweeted by @imVkohli)