In Pics : दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस, भारतज 19/0, 208 धावांनी पिछाडीवर
भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरु दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकल्यावर भारत आता दुसरा सामना खेळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appढाका येथील शेर ए बांगला मैदानावर दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. 22 ते 26 डिसेंबर सामना चालणार आहे.
सामन्यात सुरुवातीला नाणेफेक जिंकून बांगलादेशनं फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला.
भारताचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याला 12 वर्षानंतर कसोटी संघात आज स्थान मिळालं,
भारतीय गोलंदाजांनी आज कमाल गोलंदाजी करत बांगलादेशच्या फलंदाजांना 227 धावांत सर्वबाद केलं. बांगलादेशचा संघ 73.5 षटकंच खेळू शकला.
यावेळी बांगलादेशसाछी मोमीनल हक याने 84 धावांची एकहाती झुंज दिल्यामुळे बांगलादेश 200 पार धावसंख्या पोहचवू शकला.
भारतीय गोलंदाजांनी आज सामन्यात सुरुवातीपासून कमाल कामगिरी केली. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या. यामध्ये उमेश यादवने 4 तर जयदेव उनाडकटने 2 विकेट्स घेतल्या.
तर रवीचंद्रन अश्विन यानेही 4 विकेट्स घेतल्या. दुसरीकडे बांगलादेशच्या संघाला सुरुवातीपासून धावा करण्यात अडचण येत होती.
मोमीनलने 84 धावा केल्या असल्या तरी काही खेळाडूंनी त्याला साथ दिल्याने 200 पार धावसंख्या जाऊ शकली.
सध्या भारत फलंदाजी करत असून केएल राहुल आणि शुभमन गिल फलंदाजी करत आहेत. 19/0 अशी भारताची स्थिती आहे.