In Pics : दुसऱ्या कसोटीत भारताचा 3 विकेट्सनी विजय, मालिकाही 2-0 ने घातली खिशात
भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यात पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी भारताने तीन गडी राखून विजय मिळवला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाआधी भारताने चितगाव येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 188 धावांच्या तगड्या फरकाने विजय मिळवला होता.
ज्यानंतर बांगलादेशचा दुसरा डाव 231 धावांवर आटोपला आणि भारताला विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य मिळाले, जे पार करता करता भारताचे 7 गडी बाद झाले पण अखेर अय्यर आणि अश्विन जोडीने संयमी खेळ दाखवत 3 गडी राखून विजय मिळवला.
भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुल याच्या नेतृत्त्वाखाली हा विजय मिळवत भारतानं बांगलादेशविरुद्ध एकही कसोटी सामना न गमावण्याचा रेकॉर्ड कायम ठेवला आहे.
दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत 227 धावाच केल्या, ज्याच्या बदल्यात भारतानं 314 धावा आपल्या पहिल्या डावात स्कोरबोर्डवर लावल्या.
ज्यानंतर बांगलादेशचा दुसरा डाव 231 धावांवर आटोपला आणि भारताला विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य मिळाले.
जे पार करता करता भारताचे 7 गडी बाद झाले पण अखेर अय्यर आणि अश्विन जोडीने संयमी खेळ दाखवत 3 गडी राखून विजय मिळवला.
सामन्यात दोन्ही डावात मिळून 6 विकेट्स आणि दुसऱ्या डावात महत्त्वपूर्ण नाबाद 42 धावा करणाऱ्या अश्विनला सामनावीर म्हणून तर मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या पुजाराला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं.
आता यानंतर भारतीय संघ 3 जानेवारीपासून श्रीलंका संघाविरुद्ध मर्यादीत षटकांच्या सामन्यांची मालिका भारतात खेळणार आहे.