No Shadow Day: सूर्य डोक्यावर आला अन् वाशिमकरांची सावली हरवली; शून्य सावली दिवस म्हणजे नेमकं काय?
भारतात वर्षातून दोनदा शून्य सावली दिन असतो - साधारणपणे एप्रिल आणि ऑगस्टच्या सुमारास. या महिन्यांत, सूर्याचा आकाशातील प्रवास त्याला काही विशिष्ट प्रदेशांवर थेट आणतो
Continues below advertisement
no shadow day
Continues below advertisement
1/6
वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना गेल्या 3 दिवसा पासून विविध भागात आपली सावली गायब होण्याचा अनुभव आज आला.
2/6
सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन होतं. हा भासमान मार्ग पृथ्वीच्या कर्कवृत्त व मकरवृत्ताच्या दरम्यान असतो. त्यामुळे या भागातील गावांमध्ये वर्षातून दोनदा सूर्य थेट डोक्यावर येतो.
3/6
त्यामुळे वस्तूंची व्यक्तींची सावली अदृश्य होते. वर्षातून दोनदा सूर्य आपल्या अगदी डोक्यावर येतो.त्यामुळे आपली सावली वर्षातून दोनदा गायब झाल्याचे आपल्याला दिसते.
4/6
सध्या सूर्याचे उत्तरायण सुरू आहे. या दिवसातली ही खास भौगोलिक घटना आहे. यानंतर परत सूर्याचे दक्षिणायन सुरू झाल्यानंतर तीन महिन्यानंतर ही घटना आपल्याला पाहायला मिळेल.
5/6
ही एक मजेशीर भौगोलिक घटना आहे. कामारगावच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी याचा अनुभव घेतला. एरवी अस म्हटलं जातं सावली माणसाची साथ सोडत नाही.
Continues below advertisement
6/6
मात्र, मे महिन्याच्या 15 ते 25 तारखेदरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून भर दुपारी काही क्षणांसाठी का होईना सावली साथ सोडते. आज कारंजा तालुक्यात 12:20 मिनिटानंतर प्रत्येकाच्या सावलीने त्याची काही क्षण साथ सोडली होती.
Published at : 22 May 2025 03:37 PM (IST)