Mumbai Goa Mahamarg Accident: 'पहिल्याच पावसात' मुंबई-गोवा महामार्गाचे पितळ उघडे; खेडजवळ रस्ता खचल्याने टँकर उलटला, PHOTO
Mumbai Goa Mahamarg Accident: खेड तालुक्यात रस्ता खचल्याने टँकरचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात जीवितहानी टळली. मात्र, टँकरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
Continues below advertisement

Mumbai Goa Mahamarg Accident
Continues below advertisement
1/10
कोकणात मान्सूनचे आगमन होताच पहिल्याच मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था समोर आली असून रस्त्याचा काही भाग खचल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
2/10
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आवाशी परिसरादरम्यान हा महामार्ग खचला असून, या खचलेल्या रस्त्यामुळे एका अवजड टँकरला भीषण अपघात झाला आहे.
3/10
गेल्या दोन दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे रस्त्याखालची माती वाहून गेली, ज्यामुळे रस्ता अचानक खचला आणि त्यावरून जाणारा टँकर थेट पलटी झाला.
4/10
सुदैवाने टँकरचालक आणि इतर प्रवासी सुरक्षित असून या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
5/10
जरी जीवितहानी टळली असली, तरी रस्ता खचून टँकर पलटी झाल्यामुळे संबंधित वाहनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
Continues below advertisement
6/10
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि हायवे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.
7/10
महामार्गावर टँकर पलटी झाल्याने आणि रस्ता खचल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक विस्कळीत झाली होती, पोलीस सध्या वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
8/10
कोकण किनारपट्टीवर गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे.
9/10
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पहिल्याच पावसात रस्ता खचल्याने प्रवाशांमधून आणि स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
10/10
पावसाळ्याची नुकतीच सुरुवात झाली असल्याने महामार्गावरील धोकादायक बनलेले इतर खड्डे आणि खचलेले भाग तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणी आता वाहनधारकांकडून केली जात आहे.
Published at : 23 Jun 2026 03:53 PM (IST)