Ambadas Danve Meet Abdul Sattar: काल दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे म्हणाले, आज थेट गळाभेट; ठाकरे आणि शिंदेंच्या आमदारांचं जुळलं, नेमकं काय घडलं?
Ambadas Danve Meet Abdul Sattar: शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांची आज समृद्धी महामार्गावर भेट झाली.

Ambadas Danve Meet Abdul Sattar
1/10
Ambadas Danve Meet Abdul Sattar: शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांची आज समृद्धी महामार्गावर भेट झाली.
2/10
विशेष म्हणजे अंबादास दानवे आणि अब्दुल सत्तार यांनी कालचं दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे, असं विधान केलं होतं.
3/10
कालच्या विधानानंतर आज ठाकरे आणि शिंदेंच्या आमदारांची भेट झाली.
4/10
भेटीदरम्यान एकमेकांच्या समोर येताच अंबादास दानवे आणि अब्दुल सत्तार यांनी गळाभेट घेतली.
5/10
अब्दुल सत्तार समृद्धी महामार्गावर मुंबईला जात असताना ,त्याचवेळी अंबादास दानवे देखील त्याच समृद्धी महामार्गाने शिर्डीसाठी चालले होते. यावेळी दोघांची समृद्धी महामार्गावर भेट झाली.
6/10
महत्वाचे म्हणजे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरमधील सर्व आमदार आणि खासदारांना मुंबईत बोलावले आहे. त्यासाठी अब्दुल सत्तारही मुंबईसाठी रवाना झाले होते आणि याचदरम्यान, सत्तार आणि दानवे यांची भेट झाली.
7/10
एकनाथ शिंदेंच्या भेटीआधी अब्दुल सत्तार यांनी अंबादास दानवेंची भेट घेतल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.
8/10
भाजपविरोधात मनात साचलेली खदखद बोलून दाखवल्यानंतर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांना तातडीने मुंबईला बोलावून घेतले आहे. आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सत्तारांसोबत एक महत्त्वाची बैठक (High-level Meeting) पार पडणार आहे. या बैठकीत समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत आणि सत्तारांच्या नाराजीवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.
9/10
केवळ अब्दुल सत्तारच नव्हे, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या (Shiv Sena) अंतर्गत गोटात मोठी अस्वस्थता असल्याचे चित्र आहे. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील शिवसेनेच्या 6 आमदारांना (MLAs) आणि 1 खासदाराला (MP) तातडीने मुंबईत बोलावले आहे. एकनाथ शिंदे या सर्व लोकप्रतिनिधींसोबत स्वतंत्र बैठक घेणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
10/10
शिवसेनेचे मुंडके उडवण्याचे काम आमचा मित्रपक्षच करत आहे. आमचा त्याग कामाख्या देवीला माहिती आहे, पण भाजप तो त्याग आता विसरली आहे. भाजपने आमचे हातपाय आधीच तोडले होते, आता थेट मुंडकंच तोडून टाकलं आहे, असं विधान अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.
Published at : 02 Jun 2026 01:18 PM (IST)