Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Ratnagiri News Goa Fort : शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अन् सरखेल कान्होजी आंग्रेंच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या गोवा किल्ल्याची तटबंदी पुन्हा एकदा कोसळली आहे.
Continues below advertisement

Ratnagiri News Goa Fort
Continues below advertisement
1/7
Ratnagiri News Goa Fort : छत्रपती शिवाजी महाराज आणि गडकिल्ले या महाराष्ट्राचे प्रेरणा आणि शौर्यस्थळ आहे. याच किल्ल्यांचे साक्षीने हिंदवी स्वराज्याचं स्वप्नाला पूर्णत्व प्राप्त झालं. अशातच या गडकिल्यांसंदर्भात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे.
2/7
रत्नागिरीच्या ऐतिहासिक अस्मितेला हादरवणारी आणि प्रत्येक शिवप्रेमीच्या मनाला वेदना देणारी ही धक्कादायक बातमी पुढे आली आहे.
3/7
image 6
4/7
हर्णे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक गोवा किल्ल्याची तटबंदी पुन्हा एकदा कोसळली आहे.
5/7
विशेष म्हणजे, किल्ल्याच्या संवर्धनासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून नुकतेच दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले होते.
Continues below advertisement
6/7
मात्र मुसळधार पावसानंतर प्रवेशद्वारासमोरील तटबंदीचा मोठा भाग ढासळल्याने या संवर्धन कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
7/7
हा केवळ किल्ल्याचा भाग कोसळलेला नाही, तर महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशालाच मोठा धक्का बसल्याची भावना शिवप्रेमींमध्ये व्यक्त होत आहे.
Published at : 12 Jul 2026 03:24 PM (IST)