PHOTO : रत्नागिरीतील भन्नाट भोगाव पॅटर्न! गावात आजवर एकही कोरोनाबाधित नाही, कोरोनाला वेशीवर रोखलं
रत्नागिरी जिल्हातील (Ratnagiri Bhogaon) असं एक गाव आहे की जिथे कोरोना (corona) सुरु झाल्यापासून दीड वर्षाचा कालावधी उलटून गेला तरीही या गावात एकही कोरोना बाधित रुग्ण (No corona Patient in Village) नाही
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकशेडी घाटापासून अवघ्या 10 किमी अंतरावर भोगाव हे गाव आहे. या गावात जवळपास 350 घरं असून 1200 लोकांची वस्ती आहे. हे गाव ग्रामीण भागात असले तरीही गेली दोन वर्षे कोरोनाला गावच्या वेशीवरच रोखण्यात यश आलं आहे.
याचे एकमेव कारण म्हणजे गावच्या ग्रामपंचायतीने आपल्या गावात केलेले नियोजन. ग्रामपंचायतीतील सरपंच, सदस्य आणि ग्रामकृतीदल यांनी कोरोना काळात आपल्या गावकऱ्यांची घेतलेली काळजी. आपल्या गावात प्रवेश करताना मुख्य प्रवेशद्वारावरच सॅनिटायझयर स्प्रे करुन त्यातूनच गावात प्रवेश करावा अशी उपाययोजना केली.
कोरोनाच्या कहरामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर ज्यांचे हातावरचे पोट आहे, त्यांनाही सध्या घरातच बसावे लागत आहे. ग्राम कृती दलाने याचा विचार करुन गावात अन्न धान्य वाटप केले.
गावकरी विश्वासाने सांगत आहेत, आमच्या गावात आजवर कोरोना बाधित एकही रुग्ण नाही. कोरोना लॉकडाऊनमुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे.
घर संसाराचा गाडा चालवायचा कसा? आर्थिक अडचणीत अडकलेल्या गावकऱ्यांसाठी गावात दरवर्षी घेतली जाणारी एक वर्षाची घरपट्टी ग्रामपंचायतीने माफ केली आहे.
गाव ग्रामीण भागात असले तरीही गेली दोन वर्षे कोरोनाला गावच्या वेशीवरच रोखण्यात यश आलं आहे.
गावच्या एकीमुळे कोरोनाला आपण वेशीवरच रोखू शकतो हे या भोगाव गावच्या रहिवाशांनी सिद्ध करून दाखवले आहे.
रत्नागिरीतला भोगाव पॅटर्न आता चर्चेत आहे. गावखेड्यात कोरोना वाढत चालला असताना भोगावचा आदर्श घेणं गरजेचं आहे.