केवळ आमिर खान-किरण रावच नाही तर या बॉलिवूड दाम्पत्याच्या घटस्फोटाच्या बातम्या ऐकून चाहत्यांना बसला होता धक्का
Aamir Khan and Kiran Rao : आमीर खान आणि किरण राव यांनी शनिवारी 15 वर्ष संसार केल्यानंतर विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही बातमी आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. कारण आजपर्यंत या दोघांमध्ये कोणताही वाद ऐकायला मिळाला नव्हता. (फोटो - सोशल मीडिया)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHrithik Roshan and Sussanne Khan - हृतिक आणि सुझान हे इंडस्ट्रीतील सर्वात क्युट जोडप्यांपैकी एक होते. दोघांचेही प्रेम म्हणजे हृतिकने करिअरच्या सुरूवातीस सुझानशी लग्न केले. पण 2013 मध्ये दोघांमधील वाद पहिल्यांदा चव्हाट्यावर आला. आणि हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले. आज दोघेही चांगले मित्र आहेत. एकत्र वेळ घालवतात. मात्र, पती पत्नीच्या नात्यातून मुक्त झाले आहेत. (फोटो - सोशल मीडिया)
Karisma Kapoor and sunjay Kapoor - करिश्मा कपूरने अभिषेक बच्चनसोबत झालेला साखरपुडा मोडत संजय कपूरला आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडले. पण तिचा लग्नाचा अनुभव खूप वाईट होता. ही गोष्ट चाहत्यांना माहित नव्हती. अशा परिस्थितीत जेव्हा करिश्मा आणि संजयच्या घटस्फोटाचा विषय ऐरणीवर आला तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला. दोघे 2016 मध्ये वेगळे झाले. (फोटो - सोशल मीडिया)
Arbaaz Khan and Malaika Arora - अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी बर्याच वर्षांपासून एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले. पण लग्नाच्या 18 वर्षानंतर जेव्हा हे संबंध तुटले तेव्हा लोकांना धक्का बसला. चाहत्यांना हे नातं तुटू नये असच वाटत होतं. मात्र, वैयक्तिक कारणांमुळे दोघांनीही स्वतःहून आयुष्य जगण्यासाठी वेगळा मार्ग निवडला. (फोटो - सोशल मीडिया)
Saif Ali Khan - Amrita Singh - सैफ अली खान आणि अमृता सिंह दोघांनीही पहिल्याच नजरेत ऐकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनीही कुटुंबाविरूद्ध जाऊन लग्न केले होते. पण लग्नाच्या काही वर्षानंतर त्यांच्या नात्याला तडा जाऊ लागला. काही काळानंतर सर्वकाही ठिक होईल असं चाहत्यांना वाटत होतं. मात्र, घडलं उलट. गोष्टी आणखी बिघडू लागल्या आणि त्या दोघांचा घटस्फोट झाला. (फोटो - सोशल मीडिया)
Farhan Akhtar and Adhuna - फरहान अख्तर आणि अधुना या दोघांची प्रेमकथा खूपच रंजक होती आणि हे जोडपेही नेहमीच एकमेकांच्या प्रेमात बुडलेले दिसायचं. पण जेव्हा दोघांनी 16 वर्षांचे नातं संपवण्याचा निर्णय घेतला तेव्हा या वृत्तामुळे सर्वांनाच धक्का बसला. कारण याआधी दोघांमधील कोणताही वाद चव्हाट्यावर आला नव्हता किंवा दोघांपैकी एकाही विवाहबाह्य संबंधात नव्हता. अशा परिस्थितीत त्यांच्या तुटलेल्या नात्यामुळे प्रत्येकजण थक्क झाले. (फोटो - सोशल मीडिया)