✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

आयुष्मान खुराना ते शाहरुख खानपर्यंत या स्टार्सचे प्रसिद्ध होण्यापूर्वीच झालं होतं लग्न

एबीपी माझा वेब टीम   |  02 Jan 2021 04:02 PM (IST)
1

बॉलिवूडमध्ये अशी धारणा होती की जर चित्रपटांमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यापूर्वी लग्न केले तर त्यांची लोकप्रियता कमी होते. परंतु, अनेक सेलिब्रिटींनी त्याची पर्वा केली नाही. चित्रपटांद्वारे लोकप्रियता मिळण्यापूर्वीच अनेकांनी संसार थाटला. चला अशाच काही सेलिब्रिटींवर नजर टाकू

2

शाहरुख खान: शाहरुखने 1992 मध्ये दिवाना या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पुरुष डेब्यू पुरस्कार मिळाला होता. पण शाहरुख खानने पदार्पणाचे यश मिळवण्यापूर्वी 1991 मध्ये आपली गर्लफ्रेंड गौरी छिब्बरशी लग्न केले होते.

3

आयुष्मान खुराना: आयुष्मान खुरानाचा विक्की डोनर 2012 मध्ये रिलीज झाला होता, त्यावेळी त्याचं लग्न झालं होतं. आयुष्मानने 2011 मध्ये चित्रपटात प्रवेश करण्याच्या एका वर्षापूर्वी आपली मैत्रीण ताहिरा कश्यपशी लग्न केले. या दोघांना विराजवीर आणि वरुष्का अशी दोन मुले आहेत.

4

सैफ अली खान: सैफ अली खानचा पहिला चित्रपट 'आशिक आवारा' 1993 मध्ये प्रदर्शित झाला होता. पण त्याने 1991 मध्ये अमृता सिंगसोबत लग्न केले. दोघांच्या वयात मोठे अंतर असूनही दोघांनी लग्न केले. अमृता सैफपेक्षा 13 वर्ष मोठी होती. दोघांनाही दोन मुले होती आणि त्यांचे लग्न 2004 मध्ये तुटले.

5

आमिर खान: 'यादों की बरात' या चित्रपटाद्वारे बाल अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश करणारा आमिर खान 1988 मधील कयामत से कयामत तक या चित्रपटातून लोकप्रिय झाला होता. यापूर्वी 1986 मध्ये त्याने आपली प्रेमिका रीना दत्ताशी लग्न केले होते. दोघांनाही दोन मुले झाली आणि 16 वर्षांत त्यांचे लग्न मोडले.

6

अर्जुन रामपाल: अर्जुनने 2001 मध्ये प्यार इश्क आणि मोहब्बत या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि त्याला लोकप्रियता मिळू लागली. याआधी तीन वर्षांपूर्वी अर्जुनने मिस इंडिया आणि सुपरमॉडेल मेहर जेसियाशी लग्न केले होते. 1998 मध्ये लग्नानंतर त्यांना दोन मुली झाल्या. 2018 मध्ये अर्जुन-मेहरचा घटस्फोट झाला.

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बातम्या
  • आयुष्मान खुराना ते शाहरुख खानपर्यंत या स्टार्सचे प्रसिद्ध होण्यापूर्वीच झालं होतं लग्न
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.