Washim Fire: ऐन दिवाळीत बळीराजावर दुबार संकट! काढनीनंतर साठवून ठेवलेल्या सोयाबीनला आग; गोडाऊन आगीत भस्मसात
Washim Fire Accident : वाशिमच्या पाटणी चौक येथे एका दुकानाच्या गोडाऊनमध्ये शेतातील काढनीनंतर साठवून ठेवलेल्या तब्बल चाळीस क्विंटल सोयाबीन गोणीला आग (Fire Accident) लागल्याची घटना घडलीय.

Washim Fire Accident : वाशिमच्या पाटणी चौक येथे एका दुकानाच्या गोडाऊनमध्ये शेतातील काढनीनंतर साठवून ठेवलेल्या तब्बल चाळीस क्विंटल सोयाबीन गोणीला आग (Fire Accident) लागल्याची घटना घडलीय. मध्यरात्रीच्या सुमारास हि आगीची घटना घडलीय. तांत्रिक बिघाड होऊन शॉर्ट सर्किटमूळे विद्युत बिघाड होऊन ही आग (Washim Fire Accident) लागल्याची शक्यता व्यक्त होतयं. वाशिम नगरपालिकेचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला असून आगीवर (Fire) नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र या आगीने अल्पावधीतच रौद्ररूप घेतलं. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं असून सोयाबीन पूर्णता जाळून खाक झाला आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे आधीच नुकसानीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यावर ऐन दिवाळीत दुबार संकट ओढवल आहे.
Jalgaon News : 75 वर्षीय वृद्ध दाम्पत्याला उघड्यावर राहण्याची वेळ
दुसरीकडे अशीच काहीशी घटना जळगाव शहरातील मोहाडी रोड भागात घडली आहे. यात ऐन दिवाळीच्या दिवसातच घर मालकाने कोणतेही कारण न सांगता, घरातील सामानाच्यासह घराच्या बाहेर काढून दिल्याने उत्तम राठोड आणि लताबाई राठोड या पंचाहत्तर वर्षीय वृद्ध दाम्पत्याला उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील मोहाडी रोड भागात राहणारे उत्तम आणि लता राठोड हे वयोरुद्ध दाम्पत्य मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. मोहाडी रोड परिसरात एका लताबाई नामक महिलेच्या घरात ते भाड्याने राहत असत. मात्र या दाम्पत्याला घरमालक लताबाई हिच्या मुलाने आज पहाटे घराच्या सामानासह घर खाली करण्यासाठी धमकावल्याने, घाबरलेल्या या दांपत्याने आपले राहते घर सामनासह सोडून देत शहरातील वाघनगर परिसरात एका झाडाच्या खाली त्यांनी निवारा शोधण्याच्या प्रयत्न केला.
Jalgaon Rain : जोरदार पावसात घरातील सामानसह ओले होण्याची वेळ
मात्र काल सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने या राठोड परिवाराचे घरातील सामानसह त्यांना ओले होण्याची वेळ आल्याचं पाहायला मिळाले. सकाळ पासूनच रात्री अंधार पडला तरी अंधारात आणि चिखलात बसलेले हे दाम्पत्य पाहून परिसरातील काही जणांनी या दाम्पत्याला जेवण दिले, तर काहींनी आपल्या परिसरात तात्पुरता निवारा उपलब्ध करून देत मानवतेचा दर्शन घडविले.
घर मालकाची असंवेदनशीलता, परिसरातील नागरिक वृद्ध दाम्पत्यांच्या मदतीला
या दाम्पत्याला विवाहित मुलगा आणि दोन मुली असल्याचं राठोड सांगतात, मात्र या मुलांना ही त्यांच्यावर ओढलेला प्रसंग सांगितला असता, मुलगा आणि मुलगी भेटण्यासाठी येणार असल्याच्या बाबत माहिती राठोड परिवाराने दिली आहे. पुढील काळात नव्याने भाड्याचे घर शोधून आपण त्यात राहायला जाणार असल्याचा मानस या दाम्पत्याने व्यक्त केला आहे. झाल्या घटनेत एकीकडे घर मालकाने एवढ्या वयस्कर दांपत्यास घराच्या बाहेर काढून देत संवेदनशीलता हरवल्याचा प्रत्यय दिला असताना, दुसरीकडे मात्र परिसरातील नागरिक या दाम्पत्याच्या मदतीसाठी धाऊन आल्याने, माणुसकी अजूनही जिवंत असल्याचं पाहायला मिळाले आहे.
ही बातमी वाचा:

























