Vijay Wadettiwar on Manoj Jarange Patil : राज्य सरकारने 2 सप्टेंबरच्या आरक्षण संदर्भात काढलेल्या शासन आदेशाबद्दल कालच्या बैठकी सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. 10 ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकारचे 2 सप्टेंबरच्या शासन आदेशमधील वगळलेला 'पात्र' शब्दा बद्दल निर्णय घेतला नाही तर ओबीसी समाज (OBC Reservation) रस्त्यावर उतरेल. जर 2 सप्टेंबरच्या शासन आदेशाच्या विरोध बोलणाऱ्यांना विरोध करा, असे जर मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांचे म्हणणे असेल तर मनोज जरांगे यांच्या हातात AK-47 द्या आणि ओबीसी समाजाचा खात्मा करायला सांगा. म्हणजे आता आम्ही आमच्या आरक्षणाचे पण रक्षण करायचे नाही का? असा संतप्त सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे.
समाजातील बाकीच्यांनी जगायचं की नाही हे जरांगे पाटलांनी सांगून टाकावं, की तुमच्या ताकदीच्या बरोबर सगळ्यांना बाकीच्या सगळ्या समाजांनावर समुद्रात बुडवून मारून टाकावे. ही जी सत्तेची दादागिरी आहे आणि हे बरोबर नाही. तरीही मनोज जरांगे यांना द्यायचेच असेल तर बंदूक आणि तलवारी द्या, छाटून टाका आमच्या सगळ्यांची मुंडके. म्हणजे जरांगे पाटलांचा समाधान होईल. अशी प्रतिक्रिया हि विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिली.
Vijay Wadettiwar on Manoj Jarange Patil : सरकार जरांगे पाटील यांच्या दबावात ओबीसी समाजाचा गळा घोटात आहे
राज्य सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या दबावात ओबीसी समाजाचा गळा घोटात आहे. सरकारने काल बोलावलेल्या बैठकीत आम्हाला अपेक्षा होती कि, ओबीसीवर अन्याय करणारा जीआर सरकार रद्द करेल. त्याबरोबर इतर काही मागण्या होत्या, परंतु ओबीसी समाजावर 2 ऑक्टोबरचा जीआर असंवेधानिक आहे आणि तो ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे. त्यामुळे तो रद्द करावा, अशी सगळ्यांची प्रमुख मागणी होती. यामध्ये ओबीसी समाजाचे 50 प्रतिनिधी होते आणि सर्वांची एकमुखाने हीच मागणी होती.
Vijay Wadettiwar on OBC Reservation: .....तर यामुळे ओबीसी समाज कुठेच दिसणार नाही
या बैठकीत अनेक तज्ञ लोक होते आणि त्यांचे म्हणणे आहे की, या जीआरमुळे ओबीसीचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, अशा पद्धतीचे दिसून येते आहे. सरकार एक तर्फीभूमिका घेत आहे. जसं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की, मराठा वेगळा आहे आणि कुणबी वेगळा आहे. सरकारच्या माध्यमातून आणि सरकारने काढलेल्या जीआरमुळे मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र सर्रासपणे देण्याचे काम सुरू आहे. यामुळे ओबीसी समाज कुठेच दिसणार नाही. ना नोकऱ्यांमध्ये दिसेल, ना कोणत्या मंडळावर दिसेल, जे छोटे छोटे समाज आहेत या समाजाचे भविष्य अंधकार दिसत आहे. असेही काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले.
शासनाचा जीअर महाराष्ट्रातील 374 जातींवर अन्याय करणारा आहे, हे स्पष्ट मत आहे. त्यामुळे आम्ही 10 ऑक्टोबरला मोर्चा काढणार आहोत. या जीआर मध्यला पात्र शब्द सुद्धा वगळावा. पहिल्यांदा मात्र हा शब्द नव्हता, नंतरच्या एक तासात जीआरमध्ये पात्र शब्द टाकला आहे आणि ऑनलाईन सिग्नेचर घेतलेला आहे. हा सगळा निर्णय दबावात झालेला आहे, एखादा प्रस्थापित समाज ज्याच्याकडे सगळं काही आहे. सत्ता आहे, संपत्ती आहे, ऐश्वर्या आहे, यात जर काही गरीब लोक असलेले त्याच्यासाठी ईडब्ल्यूएसची व्यवस्था आहे. त्यांना ओबीसीमधूनच आरक्षण द्या, अशी मागणी चुकी आहे. असेही विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले.
आणखी वाचा