Nagpur News : राज्यभरात सध्या मुसळधार पावसाने एकच हाहाकार केल्याचे चित्र आहे. तर विदर्भ मराठवाड्यासह उर्वरित बाधीत जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आता सर्व स्थरातून होऊ लागली आहे. असे असताना विदर्भातील शेतकरी आत्महत्येचे (Farmer Suicides) भीषण वास्तव आता समोर आले आहे. राज्याची उपराजधानी नागपूर विभागात गेल्या 8 महिन्यात तब्बल 296 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याचे विदारक चित्र आहे.
दरम्यान, सरकारी पातळीवर शेतकरी आत्महत्या प्रकरणी अनास्था असल्याचे बोललं जात असून गेल्या एप्रिल महिन्यात सर्वाधिक 50 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. तर गेल्या ऑगस्ट महिन्यात 28 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली आहे. सोबतच गेल्या आठ महिन्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदतीपोटी 1 कोटी 58 लाख रुपयांचा मदतनिधी वितरित केल्याची माहिती कृषि राज्यमंत्री आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांनी दिली आहे.
जानेवारी ते ऑगस्ट 2025 या कालावधीत नागपूर विभागात 296 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
- जानेवारी - 29
- फेब्रुवारी - 37
- मार्च - 35
- एप्रिल - 50
- मे - 31
- जून - 43
- जुलै - 43
- ऑगस्ट - 28
- 296 पैकी केवळ 162 प्रकरणे पात्र तर 40 प्रकरणे चौकशी करिता प्रलंबित
- शेतकऱ्यांना मदतीपोटी 1 कोटी 58 लाख रुपयांचा निधी वितरित
वर्ध्यात होणार शेतकरी हक्क न्याय परिषद; देशभरातील शेतकरी नेत्यांची वर्ध्यात हजेरी
वर्ध्यात येत्या सतरा सप्टेंबर रोजी शेतकरी हक्क न्याय परिषद आयोजित करण्यात आली आहेय. दिल्लीत संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वात शेतकरी विरोधी काळे कायदे सरकारला मागे घ्यायला भाग पाडणारे शेतकरी नेते यात सहभागी होणार आहे. राकेश टिकेत, युद्धवीर सिंग, अशोक ढवळे, अनिल त्यागी, अजित नवले, बच्चू कडू, विजय जावंधीया हे यात सहभागी होणार आहे. सध्या देशात असलेली शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना एकत्र येत मोठा लढा देण्याची गरज आहे. या शेतकरी हक्क परिषदेमध्ये विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्यायाचा प्रश्न उपस्थित केला जाणार आहे. कापसावरील आयात बंदी उठविण्यात आल्याचा जाब यातून विचारला जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत अविनाश काकडे आणि यशवंत झाडे यांनी दिली आहे. यादरम्यान शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेटी दिल्या जाणार आहे.
मराठवाड्यातील आमदारांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट
मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी मराठवाड्यातील आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतलीय. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पावसाचा मोठा फटका बसला शेतीला बसल्याने बळीराज्याला दिलासा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी भाजप आमदार रत्नाकर गुट्टे, राष्ट्रवादी कांग्रेस राजू नवघरे, राजेश विटेकर आणि ठाकरे गटाचे राहुल पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे.
आणखी वाचा