एक्स्प्लोर

Raigad News : छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव किल्ले रायगड ग्रुप ग्रामपंचायत करा, ग्रामस्थांचा नामांतराला पाठिंबा 

निजामाच्या खुणा इतिहासजमा करत छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचं नवं नाव ‘किल्ले रायगड ग्रुप ग्रामपंचायत नाव करावं अशी मागणी छत्री निजामपूर गावकऱ्यांच्या ग्रामस्थांनी करत नामांतराला पाठिंबा दिला.

रायगड :  रायगड जिल्ह्यातील छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीशी निगडित असलेल्या छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव अखेर बदलणार आहे. आता ही ग्रामपंचायत ‘किल्ले रायगड ग्रुप ग्रामपंचायत’ म्हणून ओळखली जाणार आहे. ग्रामस्थांनी ग्रामसभा घेत याला मान्यता दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या नावबदलाची मागणी होती. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा रायगडाच्या दौऱ्यात हा मुद्दा जोरदार उपस्थित केला होता, तर स्थानिक आमदार भरत गोगावले यांनी यास पाठिंबा दिला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंदर्भात पत्र सादर करण्यात आलं होतं.

छत्री निजामपूर, वाघेरी आणि रायगड वाडी या तीन महसुली गावांची विशेष ग्रामसभा पार पडली. यात एकमतानं नामांतराविषयी निर्णय घेण्यात आला.छत्री निजामपूर ग्रुप ग्रामपंचायतीचं नाव बदलून ‘किल्ले रायगड ग्रुप ग्रामपंचायत’ करावं अशी मागणी सर्वानुमते करण्यात आली आहे

या निर्णयाचं ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केलं. मात्र, ग्रामपंचायत कार्यालय छत्री निजामपूरमध्येच राहावं, अशी आग्रही मागणीही ग्रामसभेत ग्रामस्थांनी केली आहे. गोपीचंद पडळकर यांच्याकडून प्रथम नामांतराचा मुद्दा चर्चेत आणला गेला होता. 

स्वराज्याच्या राजधानी असलेल्या किल्ले रायगड परिसरातील छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचा मुद्दा आता चांगलाच चर्चेत आला होता. सत्ताधारी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीच हा मुद्दा उपस्थित करून निजामाच्या खुणा पवित्र रायगडची ओळख सांगत असतील तर ते आपले दुर्दैव असं म्हटलं होतं. किल्ले रायगड ज्या ग्रामपंचायत हद्दीत येते त्या छत्री निजामपूर या ग्रामपंचायतीचे नाव रायगडवाडी करा अशी मागणी पडळकर यांनी केली होती. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी देखील नाव बदलण्यास समर्थन दिलं होतं. 

राज्यात भाजप सरकार आल्यानंतर अनेक जिल्ह्यांच्या नामांतरं करण्यात आली आहेत. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव, अहमदनगरचे अहिल्यानगर करण्यात आलं होतं. किल्ले रायगड ज्या ग्रामंपचायतीच्या हद्दीत येतो त्याचं नाव छत्री निजामूपर ऐवजी रायगडवाडी करा अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केल्यानंतर स्थानिकांनी देखील नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. 

Gopichand Padalkar : छत्र निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव रायगड वाडी करा; गोपीचंद पडळकरांची नवी मागणी, नामांतराचा मुद्दा सरकारच्या दारी जाणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bacchu Kadu Farmers : आरक्षणाच्या लढाईपेक्षा मातीची लढाई गरजेची तरच शेतकरी सुखी होईल
Bacchu Kadu Farmer Protest:  बच्चू कडूंच्या आंदोलनाचं सुरुवात ते शेवट, इनासाईड स्टोरी काय?
Bacchu Kadu Farmers Protest :बच्चू कडूंचा नवा लढा, आता पूर्ण महाराष्ट्रात पायी दौरा करणार
Bacchu Kadu On Farmers Loss : शेतकऱ्यांना चालू वर्षांत कर्जमाफी देणं का गरजेचं? बच्चू कडूंनी गणित मांडलं
Bacchu Kadu On Farmers Protest : राजकारण हललं की बच्चू कडू आंदोलन करतात का? बच्चू कडूंचं उत्तर ऐकाच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
BJP President : भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार?  राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार? राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य , बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Embed widget