पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul gandhi) यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत कर्नाटक आणि महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत राहुल गांधींनी चक्क पत्रकार परिषदेतच पुरावे सादर केले. त्यानंतर, देशभरात ईव्हीएमवरील (EVM) निवडणूक प्रक्रिया आणि आयोगावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विरोधकांनी, इंडिया आघाडीने निदर्शने करत आमच्या मतांची चोरी झाल्याचे म्हटले. त्यामुळे, राहुल गांधी सध्या चर्चेत असून आज त्यांच्याकडून न्यायालयात खळबळजनक माहिती लेखी स्वरुपात देण्यात आली आहे. मतचोरीच्या मुद्द्यामुळे राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याचं राहुल गांधींच्या वकिलांनी पुणे (Pune) कोर्टात म्हटलंय. सात्यकी सावरकरांनी राहुल गांधींच्या विरोधात दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्याच्या सुनावणी दरम्यान राहूल गांधींचे वकील मिलींद पवार यांनी लेखी स्वरुपात ही माहिती दिलीय. 

Continues below advertisement

लोकसभा 2024 मधील निवडणुकीत झालेल्या मतचोरीचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे, अशी माहिती लेखी स्वरुपात काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी पुण्यातील विशेष न्यायालयात दिली. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरुद्ध पुण्यातील न्यायालयात खटला दाखल आहे. त्यावरील सुनावणीवेळी राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी ही माहिती लेखी स्वरुपात न्यायालयात दिली. 

मिलिंद पवार यांनी न्यायालयात दिलेल्या लेखी माहितीनुसार, भाजपाचे नेते तरविंदर मारवा यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी नीट वागावे, नाहीतर त्यांच्या आजीचे (इंदिरा गांधी) जे झाले, तेच राहुल गांधी यांचे होईल. भाजपाच्या आणखी एका नेत्याने राहुल गांधी यांना दहशतवादी म्हटले आहे. सध्याचे राजकीय वातावरण आणि या खटल्यातील याचिकाकर्ते सत्यकी यांचे गोडसे घराण्याशी असलेले संबंध पाहाता राहुल गांधी यांच्या जीवाला धोका आहे, अशी माहिती न्यायालयात आज देण्यात आली. हिंदूत्वाचे समर्थन करणारे जहालमतवादी यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे कारण राहुल गांधी यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी विशेष न्यायालयाला लिहिले आहे.

Continues below advertisement

मी शपथपत्र का देऊ - राहुल गांधी

दरम्यान, राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगानेही उत्तर दिलं असून राहुल गांधींना न्यायालयात शपथपत्र सादर करण्याचेही सूचवले आहे. मात्र, मी मतचोरी संबंधी सादर केलेली सर्व माहिती ही निवडणूक आयोगाने दिलेल्या कागदपत्रांच्या आधारेच करण्यात आली आहे, ती माहिती माझी नाही. त्यामुळे मी त्यावर शपथपत्र का देऊअसा सवाल राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर थेट मतचोरीचे आरोप केले आहेत. त्यावर आयोगाने त्यांना स्वाक्षरी केलेले शपथपत्र सादर करण्याची सूचना दिली होती.

हेही वाचा

माझं मुंबईतील घर राहण्यायोग्य नाही, भाड्यानं घर मिळणंही कठीण; मुंडेंनी सरकारी बंगला न सोडण्याचं दिलं कारण