Pune Startup Repose india: पुण्यातील मोबाइल एनर्जी डिस्ट्रीब्यूशन स्टार्टअप रेपोस एनर्जीचे रतन टाटा यांच्या एका फोनने नशीब पालटले. पुण्यातील स्टर्टअप कंपनी  रेपोस एनर्जीचे फाऊंडर आदिती भोसले वाळुंज (Aditi Bhosale Walunj) आणि चेतन वाळुंज  ( Chetan Walunj)  पुण्यातील आदिती भोसले वाळुंज आणि चेतन वाळुंज यांनी रेपोस एनर्जी नावाचा स्टार्टअप सुरू केला होता. मोबाइल ऊर्जा वितरण स्टार्टअप रेपोस एनर्जीने सेंद्रिय कचऱ्यावर चालणारे 'मोबाइल इलेक्ट्रिक चार्जिंग व्हेईकल' लाँच केले आहे. पुण्यातील हा स्टार्टअप उद्योगपती रतन टाटा यांच्या कंपनीच्या गुंतवणुकीतून सुरू झाला आहे. मात्र त्यांच्या आणि रतन टाटांच्या भेटीचा एक रंजक किस्सा आहे. तोच किस्सा अदिती यांनी शेअर केला आहे.



"रतन टाटा सरांसोबत आमची भेट काही सामान्य नव्हती. तुमची दृष्टी नेहमी तुमच्यापेक्षा आणि मी, मी आणि माझ्यापेक्षा मोठी असावी, असं सदगुरु कायम सांगतात.चेतन आणि मी हे मनापासून घेतले आणि काही वर्षांपूर्वी आमचा रेपो प्रवास सुरू केला. आणि आम्ही दोघांनी ठरवले की आम्हाला एक मार्गदर्शक हवा आहे ज्याने "मी मी आणि मायसेल्फ" च्या पलीकडे मोठ्या चांगल्यासाठी काहीतरी केले आहे. आणि यात शंका नाही की आम्हा दोघांचे एक नाव होते ते म्हणजे रतन टाटा सर. आपण त्यांना भेटूया असा आमच्यात संवाद झाला. मात्र चेतनने लगेच कसंकाय जमणार? असा प्रश्न निर्माण केला. रतन टाटा आपले शेजारी नाहीत असंही तो हसत म्हणाला होता", असं अदिती सांगतात



नो... हा पर्याय कधीच नव्हता 
आम्हा दोघांचे कोणतेही व्यावसायिक शिक्षण नाही पण आम्ही आमच्या आयुष्यात एक गोष्ट खूप लवकर शिकलो की "कोणत्याही गोष्टीकडे निमित्त साधणे हा एक पाया आहे जो अपयशाचे घर बनवतो".  तुम्ही त्यांना भेटू शकत नाही आणि ते अशक्य आहे, असं आम्हाला अनेकांनी सांगितलं मात्र आम्ही आमचं ठरलं होतं. नो... हा पर्याय कधीच नव्हता आणि आम्ही उठलो आणि मुंबईला निघालो. आम्ही ऊर्जा वितरणात कसा बदल करु शकतो आणि तंत्रज्ञानाचा वापर करून कोणतीही ऊर्जा/इंधन शेवटच्या माईलपर्यंत कसे पोहोचवू शकतो याची माहिती तयार केली. ही माहिती 3D स्वरुपात होती.



मी रतन टाटा बोलतोय?
आम्ही रतन टाटांना पत्र लिहिलं होतं. त्यांच्या घराबाहेर 12 तास थांबलो होते. त्यानंतर जरा निराश होत हॉटेलला पोहचलो. त्यावेळी आम्हाला एक फोन आला अर्थात आम्ही निराश झालो होतो त्यामुळे फोन उचलायची देखील इच्छा नव्हती. तो फोन होता रतन टाटा यांचा. आम्ही दोघंही अवाक झालो होतो. मला तुमचं पत्र मिळालं आपण भेटू शकतो का? असा प्रश्न त्यांनी विचारला आणि आमच्या अंगावर शहारे आले. सकाळी  10.45 ला आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो आणि आमच्या सादरीकरणासह  त्यांची वाट पाहत होतो आणि सकाळी 11 वाजता एक निळा शर्ट घातलेला एक उंच, गोरा माणूस आमच्या दिशेने चालू लागला आणि शांत वाटत होता. ही मिटींग तीन तास चालली. यात आम्ही आमची संकल्पना सांगितली. त्यांनी ती शांतपणे ऐकूण घेतली त्यांचे अनुभव देखील आमच्यासोबत शेअर केले. त्यांनी सहज विचारलं की तुम्हाल माझ्याकडून काय अपेक्षा आहे.देशाला जागतिक पातळीवर नेण्यास मदत करा. आम्हाला मार्गदर्शन करा असं आम्ही उत्तरलो. त्यांनी फक्त ठिक आहे असं उत्तर दिलं आणि आम्ही दोघे तिथून बाहेर पडलो. आज त्यांच्यामुळे रिपोज ही कंपनी एवढ्या मोठ्या स्तरावर काम करत आहे, असं त्या सांगतात.