पुणे : अनाथांची माय म्हणून महाराष्ट्रासह देशाला परिचित असलेल्या दिवंगत सिंधुताई सपकाळ (sindhutai sapkal) यांच्या नावाचा गैरवापर करुन तरुणाईला फसवण्याचा प्रकार समोर आला आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या पुण्यातील आश्रमात लग्नासाठी मुली आहेत असं म्हणत अनेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. लग्नासाठी (Marriage) इच्छुक असलेल्यांना फोन करून या सगळ्या संदर्भातली माहिती दिली जाते आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन म्हणून 15,000 रुपये फोन पे ने किंवा google पे ने मागवले जातात. या सगळ्या संदर्भात दोन दिवसांपूर्वी सपकाळ यांनी सासवडमध्ये तक्रार दिली होती. मात्र, दोन दिवसांनी सासवड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. एबीपी माझाने यासंदर्भात वृत्त दाखवल्यानंतर पोलिसांनी आता गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, लग्नाळू मुलांच्या पालकांची व नातेवाईकांची होणारी ही फसवणूक गंभीर असल्याचे पाहायला मिळत आहे.
एबीपी माझाच्या बातमीनंतर सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर करत मुलगी लग्नाला देतो म्हणणाऱ्या भामट्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमात लग्नासाठी मुली आहेत असं म्हणत अनेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. फोन करून या सगळ्या संदर्भातली माहिती दिली जाते आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन म्हणून 15,000 रुपये फोन पे ने किंवा google पेने मागवले जातात. या सगळ्या संदर्भात दोन दिवसांपूर्वी सपकाळ यांनी सासवडमध्ये पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, याप्रकरणी दोन दिवसांनी सासवड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, 319 (4), 318 (4), 356 (2), आयटी ऍक्ट 66 या कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, समाजात मुलांच्या लग्नासाठीची गंभीर प्रश्न असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मुलांच्या लग्नासाठी पालक, नातेवाईक मुलगी मिळावी म्हणून मोजेल ती किंमत मोजायला तयार असल्याचं दिसून येत आहे.
एबीपी माझाने ही बातमी दाखवली आणि त्यानंतर या सोशल मीडियावर हा प्रकार करणाऱ्या भामट्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, ज्या सिंधुताईंनी आपलं संपूर्ण आयुष्य अनाथ, व गोरगरिबांच्या लेकरांसाठी व्यतित केलं. त्या सिंधुताईंच्या आश्रमासंदर्भात एवढा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करायला दोन दिवस का लागले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा
जनगणनेला कधी सुरुवात? तारीख आली समोर; देशातील डोंगराळ प्रदेशातील 4 राज्यात सर्वप्रथम होणार
