Pune Rain news: मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर असणाऱ्या कुंडमळा पूल कोसळून रविवारी अनेक पर्यटक वाहून गेले होते. हा पूल कोसळला तेव्हा याठिकाणी तब्बल 100 पर्यटक उपस्थित असल्याची माहिती आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने (NDRF) कालच्या बचावकार्यात 51 जणांना नदीतून बाहेर काढले होते. यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर सध्या पवना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. तर उर्वरित लोक किरकोळ जखमी झाले होते. तळेगाव दाभाडे मधील मायमर रुग्णालयात 10 जणांना उपचारासाठी ठेवण्यात आल होत. त्यातले दोघे आयसीयूमध्ये होते. बाकी  रुग्णांना किरकोळ इजा होती त्यांना रात्रीच घरी सोडण्यात आले. तळेगाव दाभाडेतील अथर्व रुग्णालयात 17 जणांना उपचारासाठी आणण्यात आले होते. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. मात्र, काल पुलावरुन (Kunjmala bridge) पडलेले आणखी किती जण बेपत्ता आहेत, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही. त्यामुळे एनडीआरएफकडून सोमवारी सकाळी पुन्हा एकदा बचावकार्याला सुरुवात केली जाणार आहे. ( Indrayani river bridge collapse)

काल रात्रभर मावळ तालुक्यात जोरदार पाऊस झाला. सोमवारचा दिवस उजाडल्यानंतरही मावळमध्ये मुसळधार पाऊस सुरु असल्याने इंद्रायणी नदीच्या पात्रातील पाण्याचा वेग आणखी वाढला आहे. त्यामुळे आज याठिकाणी बचावकार्य करताना एनडीआरएफसमोर मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. कुंडमळा पुलाजवळ नदीच्या पाण्याचा वेग जोरदार आहे. त्यामुळे आता एनडीआरएफचे जवान नदीपात्रात उतरुन कशाप्रकारे बचावकार्य करणार, हे पाहावे लागेल.

दरम्यान, काल रात्री कुंडमळा पुलाचा नदीत पडलेला लोखंडी सांगाडा नदीपात्रातून दूर करण्यात आला होता. ही दुर्घटना घडली तेव्हा कुंडमळा पुलावर तब्बल 100 जण असल्याचे सांगितले जाते. यापैकी तब्बल 50 जणांना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे आणखी किती लोक बेपत्ता आहेत, याची नेमकी माहिती प्रशासनाकडे नाही. त्यामुळे एनडीआरएफच्या पथकाकडून नदीपात्रात उतरुन बेपत्ता लोकांचा शोध घेतला जाईल.

Kundmala bridge collapse:  आणखी दोन-तीन जण बेपत्ता असण्याची शक्यता

इंद्रायणी नदीत पडलेले आणखी किती जण बेपत्ता आहेत, याची माहिती अद्याप प्रशासनाल नाही. मात्र, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आणखी दोन ते तीन जण बेपत्ता असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा

इंद्रायणी पूल अपघाताच्या बचावकार्यात पावसाचं आव्हान? मध्यरात्रीपासून पावसाचा ठिपका थांबेना, आज पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन

इंद्रायणी पूल कोसळला, चौघांचा मृत्यू; निष्काळजीपणाचे बळी की प्रशासनाचा बेजबाबदारपणा?