पुणे : दौंड (Daund)  तालुक्यात काल रात्री नव्याने सुरु असलेल्या भीमा नदीवरील (Bhima River Bridge)  पुलाचे खांब कोसळले आहेत. दौंड आणि नगर (Daund - Ahmednagar)  जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलाचे काम चालू होते. या पुलाचे खांब कोसळले आहेत.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दौंड आणि नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या दौंड गार गावादरम्यान पुलाचं काम सुरू होतं. 20 कोटी रुपये खर्चून हे काम करण्यात येत होतं मात्र पूल उभारण्याचं काम सुरू असताना पुलाचे खांब कोसळले आहेत. 


दौंड येथील भीमा नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गार आणि दौंड आणि गार या दोन गावांना जोडणारा या पुलाचे काम सुरू असून उन्हाळ्यात भीमा नदी ही पूर्ण कोरडी होती परंतु गेल्या तीन-चार दिवसापासून राज्यात सर्वत्र पाऊस सुरू झाला आहे आणि धरणातून देखील थोडेफार पाणी नदीला सोडण्यात आले आहे. काल रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे या कामावरील पिलर चा एक भाग कोसळला त्यामुळे या कामाची पात्रता काय किती निकृष्ट दर्जाचे काम आहे हे यावरून सिद्ध होते.जर काम सुरू असते तर आणि हा असा प्रकार घडला असता तर नक्कीच कोणाला तरी आपला जीव गमवावा लागला असता.


पुलासाठी 20 कोटी रूपये खर्च


या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.  या पुलासाठी 20 कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे. या पुलाचे भूमीपूजन 2021 साली झाले. या पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे असल्याचे समोर येत आहे.  तसेच पुलाचं काम करताना सतत अडचणी येत असल्याचं समोर आलं आहे. निकृष्ट कामामुळेच हा पूल कोसळल्याचं स्थानिक म्हणत आहेत. नगर आणि पुण्यात पहिल्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यानंतर लगेच पूलाचे खांब कोसळल्याची घटना समोर आली आहे. 


भीमा नदीवरील पुलाच्या कामाची चौकशी होणे गरजेचे


भीमा नदीवरील पुलाच्या कामाची चौकशी होणे देखील गरजेचे आहे. तसेच दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. दौंड सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकारी देखील कोणतीही माहिती देत नाही, असा आरोप देखील होत आहे.  त्यामुळे या कामावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.


हे ही वाचा :


 मान्सूनचा एन्ट्रीलाच धडाका, बदाबदा कोसळणाऱ्या पावसाने पुणेकरांना धडकी, 34 वर्षाचा रेकॉर्ड मोडला