Maharashtra Rian News :  राज्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाने 7 जुलैपर्यंत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. रायगड, नाशिक, पुणे घाट आणि सातारा घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर 8 जुलैपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 5 ते 7 जुलै दरम्यानही हवामान अलर्ट जारी केला आहे. 

Continues below advertisement

रेड अलर्ट

▪️ रायगड – 6 आणि 7 जुलै▪️ नाशिक – 6 जुलै▪️ पुणे घाट परिसर – 6 जुलै▪️ सातारा घाट परिसर – 6 जुलै

ऑरेंज अलर्ट

▪️ पालघर – 6 आणि 7 जुलै▪️ ठाणे – 6 जुलै▪️ मुंबई –6 जुलै▪️ रत्नागिरी – 6  आणि 7 जुलै▪️ सिंधुदुर्ग – 6 जुलै▪️ नाशिक – 7  जुलै▪️ पुणे घाट परिसर – 7 जुलै▪️ कोल्हापूर घाट परिसर –7 जुलै▪️ सातारा घाट परिसर – 7 जुलै

Continues below advertisement

7 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार

7 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुंबई, कोकण आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता.उर्वरित भागात मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु आहे. जुलैपासून पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याचा अंदाज.

नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना

▪️ अनावश्यक प्रवास टाळा.▪️ नदी, नाले आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहा.▪️ स्थानिक प्रशासन व हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करा.▪️ आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी राहा.

मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत आत्तापर्यंत राज्यात 9 जणांचा बळी

मुंबईसह ठाणे, पालघर त्याचबरोबर कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. कारण अनक ठिकाणी रस्त्यांवर घरांमध्ये पाणी शिरलं आहे. दरम्यान, या मुसळधार पावसामुळं काही भागात दुर्घटना देखील घडल्या आहेत. मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत आत्तापर्यंत राज्यात 9 जणांचा बळी गेला आहे. तर 4 जण जखमी झाले आहेत. भिंत पडून 8 जणांचा बळी तर झाड पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  

मुंबई उपनगरात भिंत पडून 6 जण, पुण्यामध्ये एक जण तर ठाण्यामध्ये एक जणाचा भिंत पडून मृत्यू झाला आहे.  तर मुंबई उपनगरामध्ये झाड पडून आणखी एकाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून मुसळदार पाऊस सुरु आहे. या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका सामान्य नागिकांना बसला आहे, अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचं स्वरुप आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.