Cockroach Janata Party: काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पक्षाच्या स्थापनेपासून, पक्षाने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शनिवारी (6 जून) जंतर मंतरवर आपले पहिले आंदोलन केले.

Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 11 जून रोजी पुण्यात आंदोलन होणार असल्याची घोषणा केली आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथील आंदोलनानंतर कॉकरोच जनता पक्षाचे हे दुसरे आंदोलन आहे. कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके आणि पक्षाने या आंदोलनाची घोषणा केली. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी असलेल्या पुण्यात कॉकरोच पक्ष शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करेल. हे आंदोलन गुरुवारी (11 जून) दुपारी 4 वाजता पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठासमोर होणार असल्याचेही सांगण्यात आले.
पक्षाचे जंतर मंतरवर पहिले आंदोलन
कॉकरोच जनता पक्षाच्या स्थापनेपासून, पक्षाने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शनिवारी (6 जून) जंतर मंतरवर आपले पहिले आंदोलन केले. या आंदोलनात हजारो विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते. पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके सहभागी होण्यासाठी अमेरिकेतून भारतात आले. याशिवाय, देशभरातील विद्यार्थी आणि प्रख्यात अभियंता, शिक्षण सुधारक व पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला.
या आंदोलनात शेकडो लोक, ज्यात बहुतांशी तरुण होते, सहभागी झाले होते. अनेकांनी कॉकरोच मुखवटे घातले होते आणि हातात फुले धरली होती. शाळकरी मुलेही आपल्या पालकांसोबत या आंदोलनात सामील झाली. सहभागींमध्ये प्रामुख्याने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच तरुण व्यावसायिक होते. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या घोषणा देत मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलनस्थळी जमले होते. अभिजित दीपके यांनी अलीकडेच केलेल्या आवाहनात या सूचनांचा पुनरुच्चार केला आणि आंदोलनादरम्यान पोलीस अधिकाऱ्यांशी आदराने वागण्याच्या गरजेवर भर दिला. आंदोलनानंतर अभिजीत दीपक यांनी एक महत्त्वाची घोषणा केली.
जय भीमच्या घोषणा अराजकता आहेत का?
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या 'अराजकतावादी' टीकेला काॅकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित टीपकेनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मी आंबेडकरांचं पुस्तक घेऊन गेलो होतो, जे आंबेडकरांना फॉलो करतात ते अराजक असतात, जय भीमच्या घोषणा अराजकता आहेत का? अशी विचारणा केली आहे. अभिजित म्हणाला, फडणवीस जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी थोडा विचार करावा ते यूपी चे मुख्यमंत्री नाही ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत जो महाराष्ट्र सुधारणावादी आहे, सेक्युलर आहे पुरोगामी विचारांचा आहे.
राजीनाम्याशिवाय कमी काही मंजूरच नाही
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा तुम्ही नाही घेऊ शकत तर मग दुसरे प्रश्न कसे सुटणार? उत्तरदायित्व निश्चित झालं पाहिजे, व्यवस्था तेव्हाच फिक्स होईल जेव्हा कोणीतरी जबाबदारी घ्यायला तयार असेल, असे त्याने सांगितले. तो म्हणाला, केवळ अधिकाऱ्यांच्या बदल्या करून चालणार नाही. राजीनाम्याशिवाय कमी काही मंजूरच नाही. तुम्ही नुसतं ट्रान्सफर केलं, काय लायकी ठेवली जे स्टुडंट आहेत ज्यांनी आत्महत्या केली आहे. शिक्षण मंत्र्यांची जबाबदारी निश्चित होत नसेल तर यात पंतप्रधानांचीही जबाबदारी आहे. जर ते रशिया आणि युक्रेन युद्ध थांबू शकतात तर पेपर लीक थांबू शकतात, असा टोलाही त्याने लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?






















