Bangalore Crime: बंगळुरूमध्ये वाद झाल्यानंतर पत्नीची निर्घृण हत्या करुन तिथून पुण्यात पळून आलेल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. राकेश असं आरोपीचं नाव आहे. राकेशने पत्नी गौरीला मारल्यानंतर विष प्राशन करुन स्वत:चं जीवन सुद्धा संपवण्याचा प्रयत्न केला. त्याने पत्नीची हत्या केल्याची माहिती पत्नीच्या आणि आपल्याही आई-वडिलांना दिल्याची माहिती आहे. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. राकेशचा कॉल डिटेल रेकॉर्ड सीडीआरवरुन माग काढत सातारा पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले. राकेशने पत्नीची निर्घृण हत्या केली. नंतर तिचा मृतदेह सूटकेसमध्ये भरला ते सुटकेस बाथरूममध्ये टाकलं आणि याची माहिती त्यांनी जोगेश्वरी येथे राहत असलेल्या आपल्या कुटुंबातील लोकांना देखील दिली होती. त्यानंतर तो स्वतःच्या खाजगी वाहनाने बंगळुरू वरून जोगेश्वरीला येत होता. जोगेश्वरीला जात असतानाच त्याने रस्त्यात झुरळ मारण्याचे औषध व फीनेल पिले, त्यामुळे तो शिरवळच्या जवळपास बेशुद्ध झाला. या प्रकरणी राकेशच्या वडिलांनी राजेंद्र खेडेकर यांनी माहिती दिली आहे.
गौरी खूप त्रास देत होती, मी तिला मारलं, मी पण मरणार!
राकेशच्या वडिलांनी माहिती देताना सांगितलं की, राकेशचा फोन आला, त्याने सांगितलं माझ्यासोबत भांडण करत होती. चार दिवसांपूर्वी त्याने तिच्या आई वडिलांना देखील फोन केला होता. तिच्या आईने दोघांना समजवून सांगितलं. गौरीची आई ही माझी सख्खी बहीण आहे. राकेशची आत्या आहे. तिने जोगेश्वरीमध्ये देखील खूप त्रास दिला होता. राकेशने मला दुपारच्या सुमारास फोन केला. रात्री बारा वाजता निघालो आहे असं म्हणाला होता. त्यावेळी त्याने विषाची बाटली सोबत घेतलेली होती. मला त्यांनी सांगितलं की, सगळ्यांना सांगा मी असं केलं आहे, पहिल्यांदा त्याने गौरीला मारल्याचं सांगितलं नव्हतं. त्याने दुसऱ्यांदा फोन केल्यावर सांगितलं. मी तिला मारलं आहे आणि मी पण जीवंत राहणार नाही. त्यानंतर मी त्याला सांगितलं की तू असं काही करू नको. तू इकडे ये आपण पोलिस स्टेशनला जाऊ. आपण पोलिसांना सगळं सांगून तुझ्या हातून असा गुन्हा घडला आहे. त्यावर राकेश ठिक आहे म्हणाला पण, त्याआधीच मी जोगेश्वरीला पोलिस स्टेशनला गेलो. तिथे सगळं सांगितलं, त्यानंतर त्यांनी बंगळुरू पोलिसांना सांगितलं, त्यांना सर्व माहिती राकेशने दिली.
आम्ही लग्नाला विरोध करत होतो. मात्र...
मला असं कधी वाटलं नव्हतं सगळं इथंपर्यंत पोहोचेल. मात्र ते घडलं. त्यांचं रोजच भांडण होत होतं. ती कधीकधी वेड्यासारखी करायची. ती भांडणात अंगावर धावायची, तिने एकदा तिच्या भावाला देखील अंगावर धावून जाऊन मारलं आहे. तीचा स्वभाव असा आहे हे माहिती होतं, म्हणून आम्ही आधीपासून लग्नाला विरोध करत होतो. मात्र, ते एकमेकांना सोडायला तयारचं नव्हते. चार वर्षे आम्ही त्या दोघांच्या लग्नाला विरोध करत होतो. पण ते त्यांच्या निर्णयावरती ठाम होते. आम्ही एकमेकांसोबतच लग्न करू नाहीतर लग्नच करणार नाही असं दोघं म्हणत होते.
जोगेश्वरीला जात असतानाच त्याने रस्त्यात
वाद झाल्यानंतर संतापलेल्या राकेश खेडकरने पत्नी गौरीवर चाकूने वार करत तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून सुटकेसमध्ये भरले. याची माहिती त्यांनी जोगेश्वरी येथे राहत असलेल्या आपल्या कुटुंबातील लोकांना देखील दिली होती. त्यानंतर तो स्वतःच्या खाजगी वाहनाने बंगळुरू वरून जोगेश्वरीला येत होता. जोगेश्वरीला जात असतानाच त्याने रस्त्यात झुरळ मारण्याचे औषध व फीनेल पिले, त्यामुळे तो शिरवळच्या जवळपास बेशुद्ध झाला.
ससून रुग्णालयात दाखल
स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तपासणी केली असता हा आरोपी असल्याचे पोलिसांना लक्षात आले. पोलिसांनी सकाळी राकेश खेडेकरला भारती हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल केले होते, त्यानंतर उपचार करून त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असून उपचार झाल्यानंतर त्याला बंगळुरू पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
नेमकं काय घडलं?
कर्नाटक राज्यातील बंगळुरूच्या हुलीमावू भागात ही भयंकर घटना घडली आहे. महाराष्ट्रातील राकेश खेडकर नावाच्या व्यक्तीने पत्नी गौरी सांबेकर (32) हिचा खून केला. हत्येनंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे सुटकेसमध्ये भरले. यानंतर त्याने पत्नीच्या आई वडिलांना फोन करून माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता घरात त्यांना एक सुटकेस सापडली. पोलिसांना सुटकेसमध्ये गौरीचा मृतदेह आढळून आला.