Vijay Wadettiwar: कलंकित मंत्र्यांना जर काढायचं नसेल तर गोमूत्र शिंपडा, शंकराच्या पिंडीपुढे बसवा, शुद्ध करून घ्या; विजय वडेट्टीवार यांची सरकारवर बोचरी टीका
कलंकित मंत्र्यांना जर त्यांना काढायचं नसेल तर गोमित्र शिंपडा, शुद्ध होतील. श्रावणमास सुरू आहे, शुद्ध गायीचं गोमित्र शिंपडायला हरकत नाही. अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे.

Vijay Wadettiwar नागपूर : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे ( Mnister Manikrav Kokate) यांचा राजीनामा घेण्याची मुदत मंगळवारपर्यंत म्हणजेच आज संपणार आहे. अशातच कृषिमंत्र्याच्या राजीनाम्याबाबत निर्णय न झाल्यास राज्यभर शेतकऱ्यांना सोबत घेऊन छावा संघटना राष्ट्रवादीच्या विरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील ( Vijay Ghadge) यांनी दिली आहे. दरम्यान याच मुद्द्यावर बोट ठेवत आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. कलंकित मंत्र्यांना जर त्यांच्या पदावरून काढायचं नसेल तर गोमूत्र शिंपडा, शंकराच्या पिंडीपुढे नेऊन बसवा आणि शुद्ध करून घ्या. जेणेकरून ते शुद्ध झालेत असे जनतेला सांगता येईल. अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी सरकारचा समाचार घेत बोचरी टीका केली. ते नागपूर येथे बोलत होते.
....तर सरकार नालायक आहे, असा शिक्का लागला जाईल- विजय वडेट्टीवार
इजा झालं, बिजा झालं आता तिसऱ्यांदा अशी वेळ आणू नका असं म्हणणाऱ्या आता काय म्हणायचे आहे, हे मला माहित नाही. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे डागी मंत्री आहेत. सरकारने निर्णय घेतला नाही, तरच सरकारची काम करण्याची पद्धत शेतकरी किंवा जनतेच्या विरोधात बेईमानीची आहे आणि हे सरकार नालायक आहे, असा शिक्का लागला जाईल. अशा कलंकित मंत्र्यांना जर त्यांना काढायचं नसेल तर गोमित्र शिंपडा, शुद्ध होतील. श्रावणमास सुरू आहे, शुद्ध गायीचं गोमित्र शिंपडायला हरकत नाही. अभिषेक करा, शंकराच्या पिंडीपुढे बसवा आणि शुद्ध करून घ्या. म्हणजे लोकांना सांगता येईल. यांना शुद्ध करून घेतलं आहे. हनीट्रॅप, शेतकऱ्यावर वक्तव्य केल्यामुळे अशुद्ध झाले होते. आता शुद्ध झालेत असे सांगता येईल, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
आम्हाला या लबाड सरकारवर विश्वास नाही- विजय वडेट्टीवार
दरम्यान, ऑपरेशन महादेव बाबत जोपर्यंत भारतीय सेना अधिकृत घोषणा करत नाही कि, पहलगामच्या आतंकी हल्लेकरी मारले. तोवर आम्हाला या लबाड सरकारवर विश्वास नाही. पहिले इतके दिवस शोधण्यासाठी कशाला लागले? देशात लपून असलेले आतमध्ये शोधण्यात वेळ का जात आहे? त्यांचा देशात घुसून मारले जाते. त्यामुळे अधिकृतपणे भारतीय सैन्य याची पुष्टी करत नाही. तोपर्यंत आम्ही विश्वास ठेवत नाही. अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.






















