एक्स्प्लोर

उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांना आवाहन, जोपर्यंत कर्जमाफी नाही, तोपर्यंत सरकारला मत देणार नाही असे बोर्ड लावा; भाजपचा पलटवार

धाराशिव येथे शेतकऱ्यांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही शेतकरी आहात ना? नाहीतर सरकारचे लोक म्हणतील मुंबईतून लोक आणली आणि टोप्या घालून बसवली.

मुंबई : राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाली असताना, दुसरीकडे शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) 4 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर पोहोचले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारची मदत मिळाली की नाही, शेतकऱ्यांना (Farmer) शासकीय मदत किती मिळाली, याचा आढावाच ते या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घेत आहेत. उद्धव ठाकरेंनी आज धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भेट घेत सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, जूनची कर्जमाफी (Loan waiver) आम्हाला मान्य नाही. जोपर्यंत कर्जमुक्ती नाही, तोपर्यत सरकारला मत नाही हे बोर्ड लावा, निश्चय करून टाका आणि सगळीकडे बोर्ड असा लावा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना केलंय.

धाराशिव येथे शेतकऱ्यांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही शेतकरी आहात ना? नाहीतर सरकारचे लोक म्हणतील मुंबईतून लोक आणली आणि टोप्या घालून बसवली. मला सभा घ्यायची नाहीय, मी तुमच्याशी बोलायला आलोय. मुख्यमंत्री म्हणाले इतिहासतली सगळ्यात मोठी मदत आहे, पण ही इतिहासातील सगळ्यात मोठी थाप आहे. तुमच्या पॅकेजला खेकड्याने भोक पाडली का? पॅकेजचं काय झालं? मदत का मिळाली नाही? अशी टीका उद्धव ठाकरेंनी धाराशिव दौऱ्यातून सरकारवर केली. हे सरकार दगाबाज सरकार आहे, या सरकारशी दगाबाजी केली पाहिजे. निवडणूक आली म्हणून मी आलोय म्हणताय, अरे आपत्ती आलीये ती थोडीच थांबली? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

विमा कंपन्याना सांगतो की, शेतकऱ्यांची सगळी रक्कम द्या, नाहीतर हे सगळे तुमच्या ऑफिसवर येतील. फसल योजनेमध्ये तुम्हाला फसवलं आहे, फसलमध्ये फसवलं आहे. कैसन बा? अरे येथे तुझा बा शेतकरी बसलाय ना? लाडकी बहीणमध्ये सगळ्यांना पैसे मिळत होते आता कुटुंबातील दोघांनाच पैसे मिळत आहेत. एक अनर्थ मंत्री, एक गृह कलह मंत्री आणि एक नगरभकास मंत्री हे आपले मंत्री आहेत, अशा शब्दात ठाकरेंनी महायुती सरकारवर टीका केली. अजित पवार म्हणताय तुम्ही हात पाय हलवा, अरे तुम्ही हलवा ना, शेतकरी भीक मागायला सरकाराच्या दारात येत नाही. जूनमध्ये कर्जमुक्ती काय करताय, अरे माणूस आत्ता आजारी आहे. आत्ता द्या, नंतर देऊन काय उपयोग? आत्ता निवडणूक येत आहे, सरकार हिंदू-मुस्लिम करतील, मराठी-अमराठी करतील, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

तोपर्यंत सरकारला मत नाही, असे बोर्ड लावा

केंद्राचं पथक आलंय, तुम्ही पाहिलं का? रात्रीचे टॉर्च घेऊन फिरताय. तीन दिवसांत सगळं झाल्यानंतर महिन्यानंतर हे पथक पाहणी काय करणार? केंद्राचा पथक दाखवा आणि 100 रुपये मिळवा असे बोर्ड दाखवा. शेतकरी एकदा उसळला तर तुमचं सिंहासन झळून खाक केल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत कर्जमुक्ती नाही, तोपर्यत सरकारला मतं नाही हे बोर्ड लावा. निश्चय करून टाका आणि सगळीकडे बोर्ड लावा की, जोपर्यंत कर्जमाफी देत नाही तोपर्यंत सरकारला मत देणार नाही, असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना केलं.

प्रवाण दरेकरांचा ठाकरेंवर पलटवार

उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा शेतकऱ्यांसाठी नाही तर राजकारणासाठी आहे, राजकारण करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात पैसे खात्यात जात आहेत. मात्र, आपल्या काळात फक्त घोषणा झाल्या, थेट काही मिळाले नाही. मुख्यमंत्री विचारा कुठे आहेत, ते शेतकऱ्यांसाठी 24 तास काम करत आहेत. तुमच्यासारखं नौटंकी भावनेवर आमचं राजकारण नाही, शेतकऱ्यांना मदत करण्याचे राजकारण आमचे कृतीतून आहे, असेही दरेकर यांनी म्हटलं. हे बरं झालं उद्धवजी तुम्ही मातोश्रीवरुन किमान बाहेर पडला आणि बांधावर गेलात तरी, शेतकऱ्यांच्या प्रति तुमचे प्रेम पुतण्या मावशीचं आहे, अशा शब्दात प्रवीण दरेकरांनी उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर टीका केलीय.

हेही वाचा

Video: बिबट्या आला रे... झोक्यावर खेळत बसलेला चिमुकला थोडक्यात बचावला; मांजरीमागे आलेल्या बिबट्याचा थरार

 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident: पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 5 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 5 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
Shardul Thakur : पालघर एक्स्प्रेस आता मुंबईच्या ताफ्यात, शार्दुल ठाकूर रोहित शर्मासोबत मैदानावर उतरणार, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा
2026 च्या आयपीएलची पहिली ट्रेड डील मुंबई इंडियन्सकडून, शार्दूल ठाकूर मुंबईच्या ताफ्यात दाखल
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ?  खरं काय खोटं काय?  ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ? खरं काय खोटं काय? ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Parbhani : परभणीत राजकीय वातावरण तापलं; मविआ, महायुती एकत्र लढणार?
Mahapalikecha Mahasangram Ichalkaranji : प्रशासक कामावर इचलकरंजीकर नाराज; नगरसेवकांकडून अपेक्षा काय?
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar नागरिकांचा कौल कुणाला? महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
Mahapalikecha Mahasangram Dhule सर्वसामान्य धुळेकरांच्या समस्या काय?; महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
Mahapalikecha Mahasangram Akola :अकोला पालिकेत कुणाची सत्ता येणार?; निवडणुकीत कोणते मुद्दे महत्वाचे?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident: पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 5 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 5 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
Shardul Thakur : पालघर एक्स्प्रेस आता मुंबईच्या ताफ्यात, शार्दुल ठाकूर रोहित शर्मासोबत मैदानावर उतरणार, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा
2026 च्या आयपीएलची पहिली ट्रेड डील मुंबई इंडियन्सकडून, शार्दूल ठाकूर मुंबईच्या ताफ्यात दाखल
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ?  खरं काय खोटं काय?  ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ? खरं काय खोटं काय? ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
मोठी बातमी! पुण्यातील नवले ब्रीजवर भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू 20 जखमी
मोठी बातमी! पुण्यातील नवले ब्रीजवर भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू 20 जखमी
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा घात करणारी पिपाणी निवडणूक आयोगाकडून कायमची हद्दपार; शशिकांत शिंदे म्हणाले, 'तर आज महाराष्ट्रातील चित्र नक्कीच वेगळं असतं!'
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा घात करणारी पिपाणी निवडणूक आयोगाकडून कायमची हद्दपार; शशिकांत शिंदे म्हणाले, 'तर आज महाराष्ट्रातील चित्र नक्कीच वेगळं असतं!'
'ज्यांनी माझी हकालपट्टी म्हटलं, त्यांनाच सणसणीत चपराक दिली' आमदार अमोल मिटकरींचा फडणवीसांची 'ती' शायरी म्हणत खोचक टोला
'ज्यांनी माझी हकालपट्टी म्हटलं, त्यांनाच सणसणीत चपराक दिली' आमदार अमोल मिटकरींचा फडणवीसांची 'ती' शायरी म्हणत खोचक टोला
Embed widget