Uday Samant on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा पुन्हा विधानपरिषदेवर निवडून जाण्याचा प्लॅन? उदय सामंतांनी डिवचलं, म्हणाले, 'उगाचच धाडस...'
Uday Samant on Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेतील सदस्यत्वाचा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपत आहे.

Uday Samant on Uddhav Thackeray: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा विधान परिषदेतील सदस्यत्वाचा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
विधान परिषदेची निवडणूक ही पूर्णपणे संख्याबळावर अवलंबून असते. सध्याच्या राजकीय परिस्थितीत महाविकास आघाडीकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने, उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक जिंकणे मोठे आव्हान ठरणार असल्याचे बोलले जात आहे. राजकीय जाणकारांच्या मते, संख्याबळ पाहता 9 पैकी महाविकास आघाडीला केवळ एकाच जागेवर यश मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही एक जागा उद्धव ठाकरे स्वतःसाठी राखून ठेवणार का, की पक्षातील दुसऱ्या नेत्याला संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Uday Samant on Uddhav Thackeray: उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंना टोला
या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना ठाकरे गटावर थेट निशाणा साधला आहे. “विधान परिषदेची निवडणूक ही संख्याबळावर होते. आमच्याकडे 237 आमदार आहेत. समोरच्यांकडे किती आमदार आहेत, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे उगाचच कोणी धाडस करणार नाही, याची मला एक कार्यकर्ता म्हणून पूर्ण कल्पना आहे,” असा टोला सामंत यांनी लगावला.
Uddhav Thackeray: संख्याबळानुसार नेमकं गणित काय?
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्याचे संख्याबळ पाहता महायुतीकडे 235 आमदार आहेत. त्यामुळे महायुतीचे 7 आमदार सहज निवडून येण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीकडे माकप आणि शेकाप धरून 48 आमदार, तसेच इतर दोन पक्षांचे काही आमदार आहेत. तर शिवसेना शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभेत 20 आमदार आहेत. या गणितात जर उद्धव ठाकरे यांनी राज्यसभा किंवा विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) किंवा काँग्रेसला पाठिंबा दिला, तर त्याबदल्यात उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेचा मार्ग मोकळा होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Uddhav Thackeray: राजकीय उत्सुकता शिगेला
उद्धव ठाकरे स्वतः विधान परिषदेवर जाण्याचा निर्णय घेणार की पक्षातील नव्या चेहऱ्याला संधी देणार, तसेच महाविकास आघाडी संख्याबळाची कसर कशी भरून काढणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. मात्र, उदय सामंतांच्या या विधानामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापले असल्याचे चित्र आहे.
आणखी वाचा
























