Shyam Manav on Ashok Kharat Case :नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणाशी (Ashok Kharat Case) एकनाथ शिंदे यांचं कनेक्शन असल्याने प्रकरणाचा सर्वार्थाने तपास सुरुझालाय, खरात (Ashok Kharat) प्रकरण आज घरोघरी पोहचलं यासाठी आभार मानले पाहिजे ते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे. कारण, हा बाबा एकनाथ शिंदे यांचा बाबा नसता, आणि अजित पवारांच्या गटातील रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) याची भक्त नसती तर कधीच हा बाबा उघड झाला नसता. कदाचित पहिलेच प्रकरण पोलिसांनी त्यांच्या पातळीवर दाबवून टाकावे, अशा सूचना मिळाल्या असत्या. पण, एकनाथ शिंदें आणि राष्ट्रवादीला धडा शिकवायचा आहे, म्हणून उत्तम प्रकारे प्रकरण हाताळण्याच्या सूचना पोलिसांना मिळाल्या. असा धक्कादायक आणि खळबळजनक आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक श्याम मानव (Shyam Manav) यांनी केलाय.
Shyam Manav on Eknath Shinde: भोंदू बाबाचे प्रकरण उघड झाल्याबद्दलं एकनाथ शिंदे यांचे आभार मानले पाहिजे
एकनाथ शिंदे, रूपाली चाकणकर यांच्यासारख्या मित्र पक्षातल्या नेत्यांचा संबंध खरातशी समोर आल्यामुळे या प्रकरणाचा तपास करू देत आहेत. अशोक खरात या भोंदू बाबाचे प्रकरण उघड झाल्याबद्दलं 'एकनाथ शिंदे' यांचे आभार मानले पाहिजे. म्हणूनचं खरात प्रकरणाचा सर्वार्थाने तपास होतोय. भोंदू अशोक खरातचे आयपीएस महिला अधिकारी आणि अनेक असे अधिकारी त्याचे शिष्य आहेत. हा खरात विविध माध्यमातून एखाद्या व्यक्तीची ब्लॅक इन्कमची माहिती काढायचा. त्यानंतर स्वतःचे बनावट इन्कम टॅक्स ऑफिसर तयार करायचा, त्यांच्या माध्यमातून धाडी टाकायचा. अशाप्रकारे या माध्यमातून पैसे उकळायचा. तेव्हा कुणीही पोलीस अधिकाऱ्यांसह राजकीय पुढाऱ्यांनी हस्तक्षेप केला नाही.
Shyam Manav: हजारो वर्षांपासून देशात हेच बिंदासपणे सुरु, नव्हे तो आपल्या कल्चरचाच भाग बनलाय
खरात सोबतच्या महिलांचे व्हिडिओ कदाचित बघितले असतील. कोणत्याही महिलांचे कपडे त्या बाबाने काढले नाही. जे बाबा महिलांना भीती दाखवतात ते मूर्ख आहेत. कारण, बाबाला काहीही करायची गरज नाही, फक्त जाहीर करायचं 'मी गुरु आहे तुमचा', बसं सगळं संपलं. सर्व आयतं उपलब्ध होत, नंबर लागत नसल्याची परिस्थिती राहते. आज देशात इतकी भयावह परिस्थिती आहे. आज एखाद्या महिलेची छेड काढली तर हाणामारीचे प्रसंग येतात. आणि याचं देशात हजारोच्या संख्येने महिला स्वतःला बाबाला अर्पण करत आहे. हजारो वर्षांपासून या देशात हे बिंदासपणे सुरु आहे, नव्हे तो आपल्या कल्चरचा भाग मानला जातोय. अशीखंतहीश्याममानवयांनीबोलून दाखवलीय.
इतर महत्वाच्या बातम्या
