Nagpur News : मायबाप सरकार! लाडक्या बहिणी खरंच तुमच्या लाडक्या आहेत, मात्र निराधार दिव्यांगाना असे विना आधार का सोडले? असाप्रश्नसरकारलाविचारात नेत्रहीन दिव्यांगांनी नागपुरात (Nagpur News) मुख्यमंत्री सचिवालय गाठलंय. संजय गांधी निराधार योजनतील (Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana) अडीच हजारांचे अनुदान गेले काही महिने अनियमितपणे मिळत असल्यामुळे आर्थिक अडचण होत असलेल्या नेत्रहीनांनी सरकारलाहासवालकरत मुख्यमंत्र्यांचे कार्यालय गाठलंआहे.
Nagpur News : तीन महिने निराधार दिव्यांगांना अनुदान न मिळाल्यामुळे आर्थिक अडचणी, नेत्रहीनांची स्थिती विदारक
राज्य सरकारकडून पात्र दिव्यांग बांधवांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दर महिन्याला अडीच हजार रुपये अनुदान दिले जाते. मात्र राज्यभरातील हजारो दिव्यांगांना फेब्रुवारी महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे अडीच हजार रुपयांचे त्यांचे हक्काचे अनुदान मिळालेले नाही. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल असे सलग तीन महिने निराधार दिव्यांगांना अनुदान न मिळाल्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. दिव्यांगामधून नेत्रहीनांची स्थिती तर फारच विदारक असून ते घर भाड्यापासून विज बिल आणि रोजच्या खाण्यापिण्यापर्यंत अडचणीत आले आहे. बहुतांशी नेत्रहीन दिव्यांग राज्यभरातील बस स्टॉप, इतर सार्वजनिक ठिकाण आणि रेल्वे गाड्यांमध्ये गोळ्या, चॉकलेट, बिस्किट विकून आपला उदरनिर्वाह करतात.
Nagpur News : नेत्रहीन बांधवांनी थेट नागपूरातील मुख्यमंत्री सचिवालय गाठलं, अधिकाऱ्यांच्या समक्ष मांडली अडचण
दरम्यान, शासनाकडून संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांगांना अडीच हजार रुपये महिना, अशी आर्थिक मदत दिली जाते. त्या भरवशावर हजारो दिव्यांग सन्मानाचा जीवन जगतात. मात्र जानेवारी महिन्यानंतर अनेकांना त्यांचा अडीच हजारांचा महिन्याला मिळणारा निधी मिळालेला नाही. तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी समाधानकारक उत्तर देत नाही, उडवा उडवीची उत्तर देऊन एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात पाठवतात. त्यामुळे काल (शुक्रवारी) नागपूर विभागातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या सुमारे 50 नेत्रहीन बांधवांनी थेट नागपूरातील मुख्यमंत्री सचिवालय गाठत आपली अडचण तिथले अधिकाऱ्यांच्या समक्ष मांडली.
लाडक्या बहिणींना पैसे द्यायला सरकारकडे निधी, मात्र दिव्यांग, नेत्रहीनांसाठीकानाही?
लाडक्या बहिणींना पैसे द्यायला सरकारकडे निधी आहे, त्यांचा अनुदान नियमितपणे सुरू आहे. मात्र दिव्यांगांना, नेत्रहीनांना निराधार योजनेचे पैसे द्यायला सरकारकडे निधी का नाही? असा सवाल या नेत्रहीनांनी विचारला आहे. दरम्यान, नागपूरातील मुख्यमंत्री सचिवालयातून तातडीने मंत्रालयात फोन करून दिव्यांगांचा निधी लवकरात लवकर देण्यात यावा, असे निर्देश दिल्याचे समजते आहे.
हे सुद्धा वाचा:
