New Mumbai: राज्यात विधानसभा निवडणुकांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झालीय. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले संदीप नाईक(Sandeep Naik) पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीच्या तिकिटावर बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला. आता पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची चर्चा आहे.(MUMBAI)

Continues below advertisement


दरम्यान, मंगळवारी रात्री संदीप नाईक समर्थक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. बंडखोरी करणाऱ्या संदीप नाईक समर्थक नगरसेवकांना मुंबईत भाजपात प्रवेश देण्यात आला. मुंबईत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. वनमंत्री गणेश नाईक आणि माजी खासदार संजीव नाईक यांच्या नेतृत्वात हा प्रवेश झाला. मात्र, भाजपच्या काही जुन्या कार्यकर्त्यांनी या नगरसेवकांना पक्षात घेण्यास विरोध दर्शवला होता. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने या नगरसेवकांना पुन्हा पक्षात घेतल्याचे बोलले जात आहे. आता संदीप नाईक लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबईतील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची चिन्हे आहेत. (Politics)


आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजपची रणनीती?


विधानसभा निवडणुकीत संदीप नाईक आणि त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. बेलापूर मतदारसंघात भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, मंदा म्हात्रे यांनी विजय मिळवला. आता 5 महिन्यांनंतर बंडखोरी करणारे नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये परतले आहेत. जुन्या भाजप कार्यकर्त्यांनी या नगरसेवकांच्या पुनर्प्रवेशाला तीव्र विरोध दर्शवलेला होता. मंदा म्हात्रेंच्या विरोधात प्रचार करणाऱ्यांना पक्षात घेणे योग्य नसल्याची भूमिका त्यांनी घेतली होती. दुपारी झालेल्या गोंधळामुळे हा पक्षप्रवेश होऊ शकला नव्हता. मात्र, गणेश नाईक यांनी सूत्रे हलवत हा प्रवेश रात्री उशिरा घडवून आणला. बेलापूर विधानसभा मतदारसंघातील आमदार संदीप नाईक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) मध्ये सामील होण्यासाठी पक्ष सोडून गेलेले नवी मुंबई भाजपचे 28 माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मंगळवारी रात्री भाजपात परतल्याने पक्षातील काही नेते नाराज असल्याचेही बोलले जात आहे.



हेही वाचा:


निवडणूक आयोगाच्या नियुक्तींबाबत नव्या कायद्यावर आज सुनावणी, मोदी सरकारने घटनापीठाचा निर्णय फिरवला; ज्ञानेश कुमारांची 17 फेब्रुवारी रोजीच नियुक्ती