Rajyasabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक, एक नाव ठरलं, विनोद तावडे अन् धैर्यशील पाटीलही शर्यतीत
Rajyasabha Election 2026: विनोद तावडे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर होऊन राष्ट्रीय स्तरावर लक्षणीय कामगिरी केली आहे. यंदा त्यांना भाजपकडून राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते.

Rajyasabha Election 2026 Vinod Tawde: येत्या 16 मार्चला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 37 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सात जागांचा समावेश आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 5 मार्च निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर 6 मार्च रोजी अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारांना माघार घेण्यासाठी 9 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळानुसार महाराष्ट्रातील 7 जागांपैकी सहा जागांवर महायुती आणि एका जागेवर महाविकास आघाडीचा खासदार निवडून जाऊ शकतो. (Rajyasabha Election 2026)
या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राज्यसभेचे आपले उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या नावांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी मंगळवारी रात्री 10 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. भाजपकडून राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात 4 उमेदवार उतरवले जाणार आहेत. यापैकी एका जागेवर रामदास आठवले यांचे नाव जवळपास निश्चित आहे. तर इतर तीन उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी भाजपच्या आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा होईल. या तीन उमेदवारांमध्ये विनोद तावडे, विजया रहाटकर आणि धैर्यशील पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. विनोद तावडे यांनी गेल्या काही वर्षांमध्ये राष्ट्रीय पातळीवर भाजपसाठी संघटनात्मक पातळीवर लक्षणीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन भाजप त्यांना राज्यसभेवर संधी देणार का, हे बघावे लागेल. तसे घडल्यास विनोद तावडे हे सक्रिय राजकारणात पुनरागमन करतील. या पार्श्वभूमीवर भाजपच्या आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 रिक्त जागा, निवडून येण्याचं समीकरण काय? (Maharashtra Rajya Sabha Election 2026)
विधानसभेचे आमदार 286
- अजित पवार आणि शिवाजी कर्डिलेंच्या निधनाने 2 जागा रिक्त
- कोटा = एकूण आमदार (286) भागीले रिक्त जागा 7 + 1 याच्या उत्तरात + 1 मिळवायचे.
- म्हणजेच = 286 / 8 =35.75
- 35.75 + 1 = 36.75
- राज्यसभेवर निवडून येण्यासाठी उमेदवाराला 36.75 म्हणजेच 37 मते मिळायला हवीत.
कोणाचे संख्याबळ किती? (Maharashtra BJP Shivsena NCP Congress MLA)
- भाजपा- 132 - 1 = 131
- शिवसेना (शिंदे गट)- 57
- राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41 - 1 = 40
- काँग्रेस- 16
- राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
- शिवसेना (ठाकरे गट)- 20
- समाजवादी पार्टी- 2
- जनसुराज्य शक्ती- 2
- राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
- राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
- एमआयएम- 1 जागा
- सीपीआय (एम)- 1
- पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
- राजर्षी शाहू विकास आघाडी- 1 (राजेंद्र यड्रावकर)
- अपक्ष- 2 (शिवाजी पाटील आणि शरद सोनावणे)
- महायुती = 131 + 57 + 40 + 2 + 1+1 + 2= 234 (2 आमदारांचं निधन)
- मविआ = 16+10+20+2+1 = 49
- इतर = 03
- एकूण = 286
कुणाचे किती खासदार निवडून येऊ शकतात? (Mahavikas Aghadi vs Mahayuti)
- भाजपकडे 131 + 1 अपक्षाचा पाठिंबा असे 132 आमदार
- जर एक खासदार निवडण्यासाठी 37 मतांची गरज असेल तर 132/37 = 3.56
- म्हणजे एकट्या भाजपचे 3 ते 4 खासदार निवडून येऊ शकतात.
शिवसेना शिंदे = 57 + 1 अपक्षाचा पाठिंबा असे 58 आमदार
- जर एक खासदार निवडण्यासाठी 37 मतांची गरज असेल तर 58/37 = 1.56
- म्हणजे एकट्या शिंदेसेनेचा 1 खासदार निवडून येऊ शकतो.
- शिंदेंकडे 20 मते अतिरिक्त असतील.
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41 - 1 = 40
- जर एक खासदार निवडण्यासाठी 37 मतांची गरज असेल तर 40/37 = 1.08
- म्हणजे एकट्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 खासदार निवडून येऊ शकतो.
- राष्ट्रवादीकडे 3 मते अतिरिक्त असतील.
मविआचे किती खासदार निवडून येऊ शकतात? (How many MPs Elected From Mahavikas Ahadi)
- काँग्रेस- 16 +राष्ट्रवादी (शरद पवार गट) 10 + शिवसेना (ठाकरे गट)- 20 = 46
- मविआला पाठिंबा देणारे छोटे पक्ष = सपा 2 + माकप 1 = 3
- मविआकडे 46+3 = 49 आमदारांचं बळ
- जर एक खासदार निवडण्यासाठी 37 मतांची गरज असेल तर 49/37 = 1.32
- म्हणजे मविआमध्ये सर्व पक्षांचा मिळून 1 खासदार निवडून येऊ शकतो.
- त्याउलट महायुतीमध्ये भाजपचे 3, शिंदेसेनेचा 1 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 आणि अतिरिक्त मतांवरुन 1 असे 6 खासदार आरामात निवडून येतील
आणखी वाचा

























