Radhakrishna Vikhe Patil on Maratha Reservation : मराठाआरक्षणसंदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे, मागच्या वेळी हैद्राबाद गॅजेटची अंमलबजावणी, शहीद झालेल्यांना नोकरी आणि ज्या काही उणिवा आहे, त्याबाबत आज मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याशी चर्चा करणार आहोत. याभेटीदरम्यान, काही गैरसमज असतील तर तेही दूर करू. माझा जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून संवाद नाही. मात्र जे काही निर्णय घेतले ते कागदोपत्री व्यवहार जरांगे पाटील यांच्याशी केलेली आहेत. आम्ही अंमलबजावणी प्रभावीपणे केलेली आहे. काही कायदेशीरबाबी उपस्थित होतात. त्यामुळे विलंब होतो. मात्र त्यातही प्रयत्न सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांना काही गैरसमज झाला आहे, मी आज भेटून त्यांना वस्तुस्थिती सांगेन. शिवाय माझाशी चर्चा केल्यानंतर मला वाटत नाही ते उपोषणाला बसतील. असाविश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री तथा मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनीबोलतानाव्यक्तकेलाआहे.
Radhakrishna Vikhe Patil: काही अडचण सांगितल्यानंतर मला वाटत नाही, ते सातारा गॅजेटसाठी आग्रही राहतील
राज्यात 58 लाख कुणबी नोंदी निघाल्या, अडीच लाखांपेक्षा जास्त दाखले दिलेले आहेत. नंबर प्रमाणे वंशावळ नोंदलेले नाही, काही अधिकाऱ्यांनी ती नोंदवलेली नाही. जुन्या लिपी, मोडी लिपी समजण्यासाठी आपण अभ्यासक घेतले आहेत. जरांगेपाटील यांना काही गैरसमज झाला आहे, मी आज भेटून त्यांना वस्तुस्थिती सांगेन. माझाशी चर्चाकेल्यानंतर मला वाटत नाही ते उपोषणाला बसतील. सातारा गॅजेटबाबत काही अडचणी आहेत. काही अडचण सांगितल्यानंतर मला वाटत नाही, ते सातारा गॅजेटसाठी आग्रही राहतील. असेही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
Radhakrishna Vikhe Patil: ....पण ते आमच्या हातात नाही
दरम्यान, 2014 ते 2019 मध्ये जे मोर्चे निघाले तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होते. आरक्षण देण्याची भूमिका त्यांची होती. मधल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने काही केलं नाही. आमच्या सरकारने आरक्षण दिले. जरांगे पाटील यांची मराठा समाजाबाबतची भावना त्याचा आदर आहे. 961 गुन्हे आहेत, यातील बहुतांश गुन्हे मागे घेतलेले आहेत. 64 गुन्हे फक्त राहिलेले आहेत. त्यात जरांगे पाटील म्हणाले की कलमं कमी करा, पण ते आमच्या हातात नाही, असेही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
