West Bengal Election Result : पश्चिम बंगालमधील विजय हा ऐतिहासिक आहे. पहिल्याच कॅबिनेटमध्ये आयुष्यामान भारत योजेनेला मंजुरी दिली जाईल आणि बांग्लादेशी घुसखोरांवर कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं. पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडुचेरीमध्ये मिळालेल्या प्रचंड विजयानंतर दिल्लीत भाजप मुख्यालयात जल्लोष करण्यात आला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत मोठ्या घोषणा केल्या. त्यांच्या आगमनावेळी ‘मोदी मोदी’ आणि ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. 

Continues below advertisement

आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मोदींनी कार्यकर्त्यांच्या परिश्रमांचे कौतुक करत हा विजय ऐतिहासिक असल्याचे म्हटले. वर्षानुवर्षांची साधना आज यशात परिवर्तित झाली आहे. कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मीही आनंदित आहे, असे ते म्हणाले. त्यांनी पाचही राज्यांतील जनतेचे आभार मानत हा दिवस देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

PM Modi Announcement : आयुष्मान योजना आणि घुसखोरीवर निर्णय

मोदींनी पश्चिम बंगालमधील पहिल्या कॅबिनेट बैठकीत आयुष्मान योजनेला मंजुरी दिली जाईल, असे स्पष्ट केले. यासोबतच राज्यातील घुसखोरीच्या प्रश्नावर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. बंगाल आता भयमुक्त होईल आणि विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Continues below advertisement

PM Modi Democracy Statement : भारताच्या लोकशाहीची ताकद

भाषणादरम्यान मोदींनी भारताच्या लोकशाही प्रक्रियेचे कौतुक केले. जय-पराजय हा लोकशाहीचा भाग आहे. पण या निवडणुकांनी संपूर्ण जगाला भारताची लोकशाही किती मजबूत आहे हे दाखवून दिले, असे ते म्हणाले. त्यांनी उच्च मतदान टक्केवारीचा उल्लेख करत निवडणूक प्रक्रियेत सहभागी सर्व घटकांचे आभार मानले.

PM Modi Ganga Remark : गंगा आणि ब्रह्मपुत्रेचा उल्लेख

आपल्या भाषणात भावनिक संदर्भ देत 'मला कोणी पाठवले नाही, मला गंगा मातेनं बोलावले' असं पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यांनी गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांचा उल्लेख करत पूर्व भारताच्या विकासासाठी मोठे पाऊल उचलले जाईल, असे संकेत दिले.

Bengal Victory Impact : बंगालमध्ये बदलाचे संकेत

या विजयामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. दीर्घकाळ चालत आलेल्या सत्तेला धक्का देत नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात झाली आहे. आगामी काळात विकास आणि प्रशासनाच्या नव्या धोरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही बातमी वाचा: