मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर सर्वाधिक चर्चा सुरू झाली ती दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची. कारण, अजित पवारांनी निधनापूर्वी दोन राष्ट्रवादी एकत्र करण्यासंदर्भाने चर्चा सुरू केली होती, त्याअनुषंगाने बैठकाही झाल्या होत्या अशी माहिती समोर येत आहे. त्यावरुन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि प्रदेशाध्यक्षही आपला अनुभव सांगत आहेत. मात्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील (NCP) नेतेमंडळी याबाबत आग्रही नसल्याचे दिसून येते. आता, यासंदर्भात खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना प्रश्न विचारला असता, अजित दादांचं नेतृत्व सर्वांनी मान्य केलं होतं, जो लेख राष्ट्रवादीच्या मासिकात छापला ती वस्तुस्थिती असल्याचं कोल्हेंनी म्हटलं. मात्र, दादांच्या निधनामुळे सगळे डायनामिक्सच बदलून गेल्याचंही त्यांनी सांगितलं. 

Continues below advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दोन राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरुन सातत्याने उपस्थितीत प्रश्नावर प्रतिप्रश्न केला होता. कोणत्या राष्ट्रवादीचं कोणत्या राष्ट्रवादीत विलिनीकरण होणार? याचं उत्तर कोण देणार असा प्रश्न सुनिल तटकरेंनी विचारला होता. तसेच, शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार का? हाही प्रश्न यानिमित्ताने समोर येत होता. याबाबत खासदार अमोल कोल्हेंनी भूमिका मांडला. तुम्ही सत्तेत जाणार होतात की विरोधात बसणार होतात, असा प्रश्न कोल्हेंना विचारण्यात आला होता. त्यावर, 

जर-तर ज्या गोष्टीवर बोलण्यात अर्थ नाही. पण, विलिनकरणासंदर्भाने राष्ट्रवादीच्या मासिकातही ते छापून आलं होतं. अजित दादांचं नेतृत्व स्वीकारण्याविषयी सर्वांचं एकमत झालं होतं. त्यामुळे, अजित दादांचं नेतृत्व मान्य झाल्यानंतर अजित दादांच्या मनात काय होतं? ह्या सगळ्या शक्यतांवर चर्चा होत आहेत. परंतु , दादांच्या अकाली निधनाने हे सर्व डायनामिक्सच बदलले आहेत. त्यामुळे, कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही की अजित दादांच्या मनात काय होतं? असे म्हणत खासदार कोल्हेंनी याबाबत सविस्तरपणे बोलणे टाळले. एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिकमध्ये अमोल कोल्हेंनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासह सुनेत्रा पवारांचे नेतृत्व आणि इतरही प्रश्नावर उत्तरे दिली. 

Continues below advertisement

हेही वाचा

नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा, गेट वे ऑफ इंडियाजवळ कार्यक्रम; दक्षिण मुंबईतील अनेक मार्ग बंद, पोलिसांचं आवाहन