Marathwada Flood Relief: 100 रुपये प्रति कोंबडी, गोठा-दुकानदारांना 50 हजार; परीक्षा शुल्क माफ, देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
Marathwada Flood Relief: मराठवाड्याच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 31 हजार 628 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे.

Marathwada Flood Relief: मराठवाड्याच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी (Marathwada Flood Relief) राज्य सरकारकडून 31 हजार 628 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. बागायतीसाठी प्रतिहेक्टर 32 हजार 500 रुपये, तर हंगामी बागायतीसाठी 27 हजार रुपये मिळणार आहे. आज (7 ऑक्टोबर) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत नुसकानग्रस्त शेतकऱ्यांसाठी (Marathwada Farmer) मदतीची घोषणा केली. खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी 47 हजार रुपये रोख आणि मनरेगातून 3 लाख रुपयांची काम देणार असल्याची घोषणाही देवेंद्र फडणवीसांनी केली.
देवेंद्र फडणवीसांच्या मोठ्या घोषणा- (CM Fadnavis announcements for farmers)
अतिवृष्टीग्रस्तांना सरकारी मदत- (devendra fadnavis announced compensation for flood affected Marathwada)
- राज्य सरकारकडून 31 हजार 628 कोटी रुपयांचे पॅकेज
- खरडून गेलेल्या शेतीला ४७ हजार हेक्टरी आणि ३ लाख हेक्टरी नरेगाच्या माध्यमातून
- जवळपास साडेतीन लाख हेक्टरी भरपाई
- दुधाळ जनावरांना 37 हजार रुपयांपर्यंत मदत
- गाळ भरलेल्या विहिरींसाठी 30 हजार
- कुकुटपालनाला 100 रुपये प्रति कोंबडी
- पडझड झालेली घरं नव्याने बांधण्यासाठी मदत
- डोंगरी भागातील घरांना 10 हजारांची अधिकची मदत
- गोठा, दुकानदार यांना 50 हजार मदत करणार
- परीक्षा शुल्कात माफी करणार
पीक नुकसानभरपाई-(Compensation for flood affected Marathwada Farmers)
- रब्बीचे पिकासाठी हेक्टरी 10 हजार रुपये
- हंगामी बागायती शेतीसाठी हेक्टरी 27 हजार रुपये
- बागायती शेतीसाठी हेक्टरी 32 हजार रुपये
- विमा व्यतिरिक्त शेतकऱ्यांना हेक्टरी 17 हजार रुपये
- कोरडवाहू शेतकऱ्यांना 35 हजार
शेतकऱ्यांसाठी आत्तापर्यंतचं सर्वात मोठं पॅकेज- (Big Relief Fund For Farmer)
शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेलं हे आत्तापर्यंतचं सर्वात मोठं पॅकेज आहे. शेतकरी रब्बीचे पिक घेतोय की नाही हे विचारत न घेता आम्ही 10 हजार रुपयांची मदत करत आहोत, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. तसेच, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज सकाळीच फोन केला. विम्या संदर्भात बैठक घेत तातडीनं योग्य मदत दिली पाहिजे यासाठी सरकार दबाव आणेल, व्हॅलिडेशनसाठीही आता आपण प्रयत्न करतोय. शेतकऱ्यांना मदत करायची आहे, तर ताण सहन करावा लागेल. इतकी अतिवृष्टी होईल याची कल्पना नव्हती. काही बाबींवर ताण सहन करावा लागेल, आत्ताच सांगता येत नाही. पण, शेतकऱ्यांना तात्काळ पैसे देणं सुरु करतोय, कुठे कमी करायचं आणि वाढवायचं हे डिसेंबच्या अधिवेशनात बघू, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.



















