Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली हजारो समाजबांधवांचा महामोर्चा 27 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईकडे (Mumbai Morcha) रवाना झाला होता. आज, 29 ऑगस्ट रोजी सकाळी, मनोज जरांगे आणि हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. तर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला सत्ताधारी पक्षासह विरोध पक्षाच्या आमदार, खासदारांनी पाठिंबा दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात मनोज जरांगेंना कोणत्या नेत्यांनी पाठिंबा दिलाय.
राष्ट्रवादी शरद पवार गट
1 उत्तमराव जानकर, आमदार माळशिरस विधानसभा
2 नारायण आबा पाटील, आमदार करमाळा विधानसभा
3 बजरंग सोनवणे खासदार, बीड लोकसभा
4 संदीप क्षीरसागर आमदार, बीड विधानसभा
राष्ट्रवादी अजित पवार गट
1) विजयसिंह पंडित – आमदार, गेवराई विधानसभा
2) प्रकाश सोळंके – आमदार, माजलगाव विधानसभा
3) राजेश विटेकर - आमदार पाथरी विधानसभा
4) राजू नवघरे - आमदार- वसमत विधानसभा
शिवसेना उद्धव ठाकरे गट
1 ओमराजे निंबाळकर – खासदार, धाराशिव लोकसभा
2 कैलास पाटील – आमदार, धाराशिव-कळंब विधानसभा
3 संजय ऊर्फ बंडू जाधव – खासदार, परभणी लोकसभा
शेतकरी कामगार पक्ष
1 डॉक्टर बाबासाहेब देशमुख, आमदार सांगोला विधानसभा,
मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)
1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
2. हैदराबाद गझेटियर लागू करा...13 महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आम्हाला सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
3. सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.
4. सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या...अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या..., अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
आणखी वाचा