= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अमेरिकेच्या लोकांना गंडा घालण्यासाठी रात्रीतून कॉलसेंटर चालवायचे, कर्मचाऱ्यांना 25 हजार पगार, छत्रपती संभाजीनगरमधून 116 जण ताब्यात छत्रपती संभाजीनगर शहरात बसून अमेरिकन लोकांना फसवणारे कॉल सेंटर संभाजीनगर पोलिसांनी उध्वस्त केलेय. छत्रपती संभाजी नगर शहरातील चिखलठाणा एमआयडीसी मध्ये असलेल्या आयटी पार्क मध्ये हा धंदा सुरू होता. सायंकाळी सहा ते पहाटे चार वाजेपर्यंत हे कॉल सेंटर चालवलं जायचं.अमेझॉन चे गिफ्ट व्हाउचर लागल्याचे आमिष दाखवून, टॅक्स न भरल्याची दिशाभूल करत गंडा घातला जायचा . पोलिसांनी मध्यरात्री छापा मारून या कॉल सेंटर मधील मेघालय, नागालँड, सिक्कीम येथील मूळ रहिवाशी असलेल्या 116 जणांना ताब्यात घेतलं आहे यामध्ये तरुण मुला-मुलींचा समावेश आहे..
बाईट प्रशांत स्वामी डीसीपी झोन 2
कसे चालत असे कॉल सेंटर
- मेघालय येथील 100 तरुण - तरुणी
- कॉल सेंटर चालवायचे
- एक वर्षापासून सुरू आहे सेंटर
- जिथे हे कॉल सेंटर चालत होते तिथे आतमध्ये पडदे लावलेले होते.
- मध्यरात्री हाय प्रोफाइल गाड्या यायच्या..
- त्यातून कामगार यायचे
- सर्वसामान्य नागरिकांची कोट्यावधींची फसवणूक
- मुळे ना व्यक्तीची इमारत आहे त्यांनी ही भाड्याने दिली होती
- त्यांनी मुलांना कंपनी सुरू करण्यासाठी ही जागा घेतली होती, ते एमआयडीसी मध्ये मोठ्या पदावर नोकरीला होते, मात्र त्यांची दोन्ही मुले परदेशात गेले त्यामुळे इमारत भाड्याने दिली आहे...
- एकूण 116 आरोपी
- अमेरिका देशातील लोकांना गंडा
- रात्री पाळीचे काम, सायंकाळी 6 वाजता सुरू करायचे काम,
-
- तरुण तरुणींना २५ हजारांपर्यंत पगार...
- मेघालय, नागालँड, सिक्कीम भागातील जास्त आरोपी आहे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नांदेडनंतर परभणीतही शासकीय अधिकाऱ्यांची गाडी फोडली नांदेड नंतर परभणीत ही शासकीय अधिकाऱ्यांची गाडी फोडली
परभणीत जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांची गाडी फोडली
काल नांदेड येथील तहसीलदारांच्या गाडीच्या तोडफोडीनंतर आज परभणीतही जिल्हाधिकारी यांची गाडी फोडण्यात आली आहे परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लावण्यात आलेली जिल्हाधिकारी यांची गाडी एका शेतकऱ्याने दगड टाकून फोडली आहे हा शेतकरी नेमका कोण आहे हे अद्याप समजले नसले तरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वातावरण मात्र तणावाचे निर्माण झाले आहे दरम्यान पोलिसांनी या शेतकऱ्याला ताब्यात घेतले असून त्याची माहिती घेतल्यास काम चालू आहे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अतिवृष्टीमुळे द्राक्ष - कांद्यांचे नुकसान,दिंडोरी- नाशिक खासदारांचे कृषिमंत्र्यांना संयुक्त निवेदन नवी दिल्ली
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी संयुक्त निवेदन दिले. शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतीची पाहणी, विमा परतावा मिळावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
भास्कर भगरे, खासदार , दिंडोरी TT
द्राक्षाचे नुकसान झाले आहे
कांदे भिजले त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे
कृषीमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे
राजाभाऊ वाजे, नाशिक खासदार TT
शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे म
आमची भागात खूप नुकसान झालं आहे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भिवंडीत अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टर भात शेतीचे नुकसान; शेतकऱ्यांचे प्रचंड हाल भिवंडी ग्रामीण भागात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा भातशेतीवर मोठे संकट कोसळले आहे. दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत सलग पावसामुळे कापणीस तयार असलेले पिक शेतातच भिजून नासाडीला लागले आहे. भाताच्या कानसातून नवीन रोप येण्यास सुरुवात झाली आहेत. सकाळी कापून ठेवलेले भात पुन्हा ओले होऊन कुजण्याच्या स्थितीत आल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. “भात ना धान्यात रूपांतरित होऊ शकतो, ना जनावरांना उपयोगाचा” अशा स्थितीत शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहेत.
या बिकट परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार शांताराम मोरे आणि शिवसेना नेते प्रकाश पाटील यांनी थेट शेतात जाऊन नुकसानग्रस्त पिकाची पाहणी केली. शेतकऱ्यांनी या वेळी प्रशासनाच्या विलंबाबद्दल नाराजी व्यक्त करत तातडीने भरपाई देण्याची मागणी केली. शेतकरी सुरेश लोणे यांनी “दिवाळीपूर्वी मिळणार म्हणून सांगितलेली मदत मिळालीच नाही; आणि आता पुन्हा पिकं गेली. मदत मिळाली नाही तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही,” अशी कडवट प्रतिक्रिया दिली. यापूर्वी देखील पावसामुळे पिकाचे नुकसान झाले होते प्रशासनाने हमी दिली की भरपाई मिळेल परंतु प्रशासनाकडून काहीच मदत करण्यात आली नव्हती.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
आत्महत्या केलेल्या डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी महाविकास आघाडीचे परळीत निदर्शने फलटण येथील आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी आज परळी येथील तहसील कार्यालयावर महाविकास आघाडीकडून निदर्शने करण्यात आले. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात राज्य सरकारने तत्काळ एसआयटीची स्थापना करून या प्रकरणाची चौकशी करावी तसेच हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे अशा मागणीचे निवेदन तहसील प्रशासनाला देण्यात आले. निदर्शनादरम्यान आंदोलकांकडून सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.या निदर्शनासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
उद्या महाराष्ट्र बंद होऊ शकते, अजून आम्ही आवाहन केलं नाही : बच्चू कडू उद्या महाराष्ट्र बंद होऊ शकते, अजून आम्ही आवाहन केलं नाही - बच्चू कडू
- आज आमचे सर्वांचे फोन बंद आहे, आज मुख्यमंत्री यांच्या घरी जेवायला जाणार आहे
- उद्या जमलं तर महाराष्ट्रात जागोजागी चक्का जाम होण्याची शक्यता नाकारता येत नाहीय, महाराष्ट्र बंद होऊ शकते
- आम्ही अजून आवाहन केलं नाहीय पण आम्हला msg येत आहे की सरकार नमलं नाहीय तर गावोगावी चक्का जाम करू, गांव बंद होईल
- शेतकरी पूर्ण गावात आहे तो रस्त्यावर उतरला तर तुमचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाहीय
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुणे येथे होणारा विभागीय मेळावा रद्द; सलग दुसऱ्यांदा मेळावा रद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुणे येथे होणारा विभागीय मेळावा रद्द
सलग दुसऱ्यांदा मेळावा रद्द करण्याची पक्षावर वेळ
पक्षाचा पुण्यात १ नोव्हेंबरला मेळावा पार पडणार होता
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्षाच्या वतीने बाळा नांदगावकर यांचे आझाद मैदान पोलिसांना पत्र महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्षाच्या वतीने बाळा नांदगावकर यांचे आझाद मैदान पोलिसांना पत्र
सत्याचा मोर्चा आणि जाहीर सभाबाबत परवानगीचे पत्र
निवडणूक आयोगाच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्षांचा निघणार आहे मोर्चा
मोर्चाला होणारी गर्दी पाहता गिरगाव चौपाटी आणि फॅशन स्ट्रीट या दोन्ही पर्यायबाबत चर्चा
याच पर्यायाबाबत चर्चा करण्यासाठी आज मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये देखील होणार बैठक
पुढील नियोजन आणि कायदा सुवेवस्था यावर पोलिसांशी आज पदाधिकारी चर्चा करणार आहेत
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बच्चू कडू यांच्या इशाऱ्यानंतर नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थाना समोरील सुरक्षा वाढवली बच्चू कडू यांनी संध्याकाळी पाच वाजता नंतर मुख्यमंत्र्यांचे नागपुरातील शासकीय निवासस्थान रामगिरीकडे कुच करण्याचा इशारा दिल्यानंतर नागपुरात रामगिरी बंगल्यासमोरील सुरक्षा व्यवस्था पोलिसांनी वाढवली आहे.. पोलीस अधिकारी रामगिरी बंगल्यासमोर पोहोचले असून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जात आहे... पोलिसांनी बच्चू कडू आणि त्यांच्या सोबतच्या मोर्चेकऱ्यांना नागपूर वर्धा रोडवरील कापूस संशोधन केंद्र जवळील मैदान स्टोपेज पॉईंट म्हणून दिलं आहे.. तिथून रामगिरी बंगला सुमारे 15 किलोमीटर अंतरावर असल्याने खरंच बच्चू कडू आणि त्यांच्यासोबतचे मोर्चेकरी रामगिरी बंगल्यापर्यंत जाऊ शकतील का असा प्रश्न आहे.. मात्र, बच्चू कडू यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर सध्यातरी पोलिसांनी रामगिरी बंगल्यासमोरील सुरक्षा चोख केली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
MNS : मतचोरी संदर्भात विरोधकांच्या एक नोव्हेंबरला मुंबईत होणाऱ्या संयुक्त मोर्चाची मनसेकडून देखील जोरदार तयारी देशभरातील मतदार याद्या आणि मतदार यादीतील घोळ या संदर्भात विरोधकांकडून निवडणूक आयोगावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील दुरुस्तीची मागणी विरोधक करत आहे.एक नोव्हेंबरला मुंबईत विरोधकांचा मतचोरी संयुक्त मोर्चा निघणार आहेत या मोर्चाच्या निमित्ताने नाशिक मनसेकडून देखील पक्ष कार्यालयाच्या परिसरात बॅनर लावून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. सत्याचा मोर्चा संविधान वाचवण्यासाठी लोकशाही जगण्यासाठी असा आशय या बॅनरवर पाहायला मिळत आहे. नाशिक मधून देखील मनसेची जोरदार तयारी या निमित्ताने मतचोरी संयुक्त मोर्च्याच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Bacchu Kadu Protest : मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत ही आरपारची लढाई असल्याचा दिला सरकारला इशारा शेतकरी कर्जमुक्ती आणि दिव्यांगांच्या मागण्यांना घेऊन प्रहारचे नेते माजी आमदार बच्चू कडू यांचा आज नागपूर येथे महाएल्गार मोर्चा धडकत आहे. विदर्भातूनच नव्हे तर, राज्यातूनही प्रहारचे शेकडो कार्यकर्ते यात सहभागी होत आहे. भंडारा जिल्ह्यातूनही हजारो कार्यकर्ते सात दिवसांचा पुरेल एवढा शिधा (राशन) बांधून नागपूरच्या या महाएल्गार मोर्चासाठी रवाना झाले आहेत. जोपर्यंत त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण होणार नाही, तोपर्यंत बच्चू भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे आंदोलनात सहभागी राहू आणि मागण्या पूर्ण करू, असा इशारा भंडाऱ्यातून निघालेल्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारला दिला आहे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Beed News: संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज सुनावणी; वाल्मीक कराडच्या संपती जप्तीच्या अर्जावर निकाल येण्याची शक्यता संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीड जिल्हा विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे.. 11 वाजता सुनावणीला सुरुवात होईल वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता कराडच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावर न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्व आरोपीचे दोष मुक्ती अर्ज फेटाळल्यानंतर आता वाल्मीक कराड वगळता इतर आरोपी जामीनासाठी अर्ज केला जाऊ शकतो.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
दिवाळीपूर्वी हवाई मालवाहतुकीला भरारी; पुणे विमानतळावर विक्रमी वाढ दिवाळीपूर्वी हवाई मालवाहतुकीला भरारी, पुणे विमानतळावर विक्रमी वाढ
पुणे विमानतळावरील हवाई मालवाहतुकीत लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे
विमानतळ प्रशासनाच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर 2025 च्या सुरुवातीपासून आयात-निर्यातीचा वेग वाढल्याचे स्पष्ट दिसून आले आहे
15 ते 16 ऑक्टोबर या 24 तासांत 108.60 मेट्रिक टन मालाचे आगमन तर 113.86 मेट्रिक टन मालाचे निर्गमन झाले. यापूर्वी 9 ते 10 ऑक्टोबरदरम्यान सर्वाधिक 131.60 मेट्रिक टन माल विमानतळावर दाखल झाला होता
14 ते 15 ऑक्टोबरला देखील 113.46 मेट्रिक टन वाहतूक नोंदली गेली
वाढती मागणी आणि सातत्याने वाढणारी हवाई मालवाहतूक लक्षात घेता आगामी काळातही गती कायम राहील
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Farmer Loan Waiver : रोजचं मरण मेल्यापेक्षा एक दिवसचा मरण मरायला आम्ही तयार; शेतकऱ्यांचा महाएल्गार Farmer Loan Waiver : 'रोजचं मरण मेल्यापेक्षा एक दिवसचा मरण मरायला आम्ही तयार आहे,' अशी संतप्त भावना मोर्चातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर संपूर्ण कर्जमाफी (Loan Waiver), शेतमालाला हमीभाव (MSP) आणि नाफेडमार्फत (NAFED) सोयाबीन खरेदी सुरू करावी, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. सरकारकडून लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. पावसातही न डगमगता, 15 दिवसांचा अन्नधान्याचा साठा सोबत घेऊन शेतकरी या 'आरपार'च्या लढाईसाठी सज्ज झाले आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Bachchu Kadu Morcha : कर्जमाफी घेतल्याशिवाय हटणार नाही, बच्चू कडूंचा महाएल्गार Bachchu Kadu Morcha : कर्जमाफी घेतल्याशिवाय हटणार नाही, बच्चू कडूंचा महाएल्गार बच्चू कडू यांच्या ट्रॅक्टर मोर्चाचे वर्ध्याच्या आर्वी येथे आगमन झाल्यावर बच्चू कडू सरकारच्या धोरणावर सडकून टीका केलीय. कर्जमाफी घेतल्याशिवाय आपण हटणार नसल्याचा निर्धार बच्चू कडू यांनी केला आहे. सरकारचा चर्चेचा प्रस्ताव आलाय. या प्रस्तावावर आपण आज वर्ध्यात मुक्काम स्थळी शेतकरी व सहकाऱ्याशी चर्चा करणार आहे. त्यानंतर आम्ही काय करायचे ते ठरवू असे बच्चू कडू म्हणाले आहेय
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Beed : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आज वडवणी बंदची हाक, बाजारपेठा बंद महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात न्याय मिळावा. या मागणीसाठी आज बीड जिल्ह्यातील वडवणी शहर आणि तालुका बंदची हाक देण्यात आलीय. पीडित कुटुंबाला न्याय मिळावा या प्रकरणात एसआयटी स्थापन करून सखोल चौकशी व्हावी आणि सदरील प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावं अशी प्रमुख मागणी आजच्या बंद मधून करण्यात येतेय. सकाळपासूनच वडवणीतील बाजारपेठा बंद ठेवून व्यापारी आणि पक्ष संघटनांनी बंदमध्ये सहभाग नोंदवला आहे. तर सदरील बंद शांततेत पाळावा यासाठी बीएनएस 168 नुसार काही जणांना नोटीस बजावण्यात आल्या.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्यात लवकरच साखरेव्या दरात वाढ होणार? राज्य सरकारचे केंद्रीय अन्न व ग्राहक संरक्षण मंत्र्यांना पत्र राज्यात लवकरच साखरेव्या दरात वाढ होणार?
साखरेची एमएसपी अर्थात किमान बाजार मूल्य वाढवण्याची राज्य सरकारच्या ऊस गाळप हंगाम धोरण बैठकीत मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्र सरकारडे शिफारस.
सध्या सारखेचा दर 3100 रुपये क्विंटल आहे तो 4100 रुपये करण्याची बैठकीत प्रमुख मागणी.
हा निर्णय झाल्यास याचा फायदा साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांना होईल.
२० ऑक्टोबरला राज्य सरकारचे केंद्रीय अन्न व ग्राहक संरक्षण मंत्र्यांना पत्र
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC) बोगस शास्त्रज्ञ प्रकरणात आणखी एक अटक भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC) बोगस शास्त्रज्ञ प्रकरणात आणखी एक अटक
मुंबई गुन्हे शाखेच्या क्राइम इंटेलिजन्स युनिटने (CIU) झारखंडमधून 34 वर्षीय सायबर कॅफे मालकाला अटक केली आहे.
हा आरोपी मोनाझिर खान असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्यावर आरोपी अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमद याला बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे तयार करून देण्यात मदत केल्याचा आरोप आहे.
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, मोनाझिर खान झारखंडमध्ये एक सायबर कॅफे चालवतो आणि त्याच ठिकाणी डिजिटल कागदपत्रे तयार करणे व फेरफार करण्याचे काम केले जात होते.
पूर्वी अटक करण्यात आलेला अख्तर अहमद हा स्वतःला भाभा अणुसंशोधन केंद्राचा शास्त्रज्ञ म्हणून दाखवत विविध देशांत प्रवास करत होता.
त्याच्याकडून पोलिसांनी 14 नकाशे आणि काही महत्त्वपूर्ण माहिती असलेले दस्तऐवज जप्त केले होते. मात्र, या कागदपत्रांची विश्वसनीयता तपासणीअंतर्गत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी मोनाझिरचा संपर्क झारखंडपर्यंत शोधून काढला आणि तिथून अटक करून चौकशीसाठी मुंबईत आणले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सोयाबीनचे हमीभाव खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांचा संताप हिंगोली जिल्ह्यांमध्ये दोन लाख 58 हजार हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी करण्यात आली होती पावसानं बऱ्यापैकी पिकांचे नुकसान झाल्यानंतर जे काही सोयाबीन शिल्लक आहे त्या सोयाबीनची काढणी पूर्ण झाली असून आताही सोयाबीन विकायचं कुठं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर समोर निर्माण झाला आहे हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला साडेतीन ते चार हजार रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळतोय तर शासनाने जाहीर केलेला हमीभाव हा 5,328 रुपये प्रतिक्विंटल इतका असून हमीभावाने हिंगोलीचा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची विक्री होत नाही व्यापारी सोयाबीनचे भाव पाडून खरेदी करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना एक ते दीड हजार रुपये प्रति क्विंटल इतका फटका बसतोय शेतातील हार्वेस्टिंग केलेल्या सोयाबीन घरात किती दिवस ठेवायचं पुढील पेरणीचे नियोजन करण्यासाठी शेतकऱ्यांना बेभाव पद्धतीने हे सोयाबीन हिंगोलीच्या बाजारात विकावे लागते तर दुसरीकडे शासन नाफेड च्या माध्यमातून हमीभावाने सोयाबीनची खरेदी करत परंतु हे खरेदी केंद्र सुद्धा अद्याप सुरू झाले नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत 50% हून अधिक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेले सोयाबीन व्यापाऱ्यांना विकलेले आहे आता तरी सरकार नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करणार का असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्यात लवकरच साखरेव्या दरात वाढ होणार? राज्यात लवकरच साखरेव्या दरात वाढ होणार?
साखरेची एमएसपी अर्थात किमान बाजार मूल्य वाढवण्याची राज्य सरकारच्या ऊस गाळप हंगाम धोरण बैठकीत मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्र सरकारडे शिफारस.
सध्या सारखेचा दर 3100 रुपये क्विंटल आहे तो 4100 रुपये करण्याची बैठकीत प्रमुख मागणी.
हा निर्णय झाल्यास याचा फायदा साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांना होईल.
२० ऑक्टोबरला राज्य सरकारचे केंद्रीय अन्न व ग्राहक संरक्षण मंत्र्यांना पत्र