Maharashtra Live Updates: उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूका रद्द करा; निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय काय घडलं?
Maharashtra Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
पार्श्वभूमी
Maharashtra Live Updates: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात (Election Commission) वज्रमूठ उगारलीय. महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर विरोधी पक्षातील शिष्टमंडळ आज (15 ऑक्टोबर) पुन्हा राज्य निवडणूक आयुक्त...More
मध्य प्रदेशात उत्पादित करण्यात आलेल्या कफ सिरपमुळे बालकांचा मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर महाराष्ट्रातही औषध निर्माण प्रशासन अलर्ट मोडवर आहे. महाराष्ट्रातही मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात कप सिरप चा पुरवठा करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने भंडारा औषध व अन्न प्रशासन विभागाने भंडाऱ्यातील औषध विक्रेत्या दुकानात तपासणी केली असता तीन औषध विक्रेत्यांकडे कप सिरप आढळून आलेत. तीन दुकानात आढळून आलेला औषध साठा भंडारा अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केला आहे. हे औषध विक्रेते डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय कप सिरप विक्री करीत असल्याचे निदर्शनात आल्यामुळे या विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात ची प्रक्रिया सुरू आहे.
पुण्यातील कोर्टाच्या नव्या इमारतीवरून उडी मारुन एका वयस्कर नागरिकांची आत्महत्या
चौथ्या मजल्यावरून थेट मारली उडी
नामदेव जाधव अस आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच नाव
आत्महत्येचा कारण अस्पस्ट
पोलीस घटनास्थळी दाखल
अंबरनाथमध्ये राहणाऱ्या एका निवृत्त जीएसटी अधिकाऱ्याची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याची बाब समोर आले आहे. याप्रकरणी सोमवारी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश रामकृष्ण पाटील हे निवृत्त जीएसटी अधिकारी असून त्यांनी आपल्या निवृत्तीनंतरची मिळालेली रक्कम चांगल्या परताव्याच्या अनुषंगाने शेअर मार्केटमध्ये गुंतवण्याचा निर्णय घेतला होता. इंटरनेटवर सर्च केल्यानंतर त्यांनी दोन ट्रेडिंग कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणूक केले. ज्या ट्रेडिंग कंपनीच्या नावावर ही गुंतवणूक करण्यात आली होती ती शेअर मार्केटमधील बड्या कंपनीच्या नावाशी समानता राखणारी असल्यामुळे त्यांना आपली फसवणूक होत असल्याचे कळाले नाही. जी ऐट आयसीआयसीआय ग्रुप आणि एल एट मोतीलाल ओसवाल स्टॉक मार्केट नावाच्या या दोन बोगस कंपन्यांमध्ये त्यांनी टप्प्याटप्प्याने तब्बल 45 लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यांच्या एका अकाउंटमध्ये तब्बल एक कोटी तर दुसऱ्या अकाउंट मध्ये सव्वा कोटीच्या वर रक्कम जमा झाल्याचे खोटे रेकॉर्ड तयार करण्यात आले होते. या जमा झालेल्या रकमेतून काही रक्कम काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र दोन्ही बोगस कंपन्यांनी पैसे काढण्यासाठी पुन्हा नव्याने पैसे भरावे लागतील असा सल्ला दिला. कंपन्यांची टाळाटाळ पाहता त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी अंबरनाथ पोलिसांकडे या प्रकरणी गुन्हा दाखल केला.
Gadchiroli Naxalites News : माओवाद विरोधातील लढ्याला आज मोठं यश प्राप्त झाले आहे. माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर तसेच सेंट्रल कमिटी मेंबर मल्लोजूला वेणुगोपाल राव (Venugopal Rao) उर्फ सोनू उर्फ भूपती याने त्याच्या 60 सहकाऱ्यांसह आज गडचिरोलीत आत्मसमर्पण केलंय. राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत हा औपचारिक आत्मसमर्पण सोहळा गडचिरोलीत पार पडला आहे. असे असताना, भूपतीने शरणागती पत्करण्यापूर्वी एक अट घातली होती, की तो शरणागती फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या समोरास पत्करेल आणि मुख्यमंत्र्यांनीही आज त्यांचे सर्व प्रमुख कार्यक्रम बाजूला ठेवले आणि जो शब्द भूपतीला दिला होता, तो शब्द आज मुख्यमंत्र्यानी गडचिरोलीला येऊन पाळला आहे.
Gadchiroli Naxalites News : माओवाद विरोधातील लढ्याला आज मोठं यश प्राप्त झाले आहे. माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर तसेच सेंट्रल कमिटी मेंबर मल्लोजूला वेणुगोपाल राव (Venugopal Rao) उर्फ सोनू उर्फ भूपती याने त्याच्या 60 सहकाऱ्यांसह आज गडचिरोलीत आत्मसमर्पण केलंय. राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत हा औपचारिक आत्मसमर्पण सोहळा गडचिरोलीत पार पडला आहे. असे असताना, भूपतीने शरणागती पत्करण्यापूर्वी एक अट घातली होती, की तो शरणागती फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या समोरास पत्करेल आणि मुख्यमंत्र्यांनीही आज त्यांचे सर्व प्रमुख कार्यक्रम बाजूला ठेवले आणि जो शब्द भूपतीला दिला होता, तो शब्द आज मुख्यमंत्र्यानी गडचिरोलीला येऊन पाळला आहे.
Gadchiroli Naxalites News : माओवाद विरोधातील लढ्याला आज मोठं यश प्राप्त झाले आहे. माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर तसेच सेंट्रल कमिटी मेंबर मल्लोजूला वेणुगोपाल राव (Venugopal Rao) उर्फ सोनू उर्फ भूपती याने त्याच्या 60 सहकाऱ्यांसह आज गडचिरोलीत आत्मसमर्पण केलंय. राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत हा औपचारिक आत्मसमर्पण सोहळा गडचिरोलीत पार पडला आहे. असे असताना, भूपतीने शरणागती पत्करण्यापूर्वी एक अट घातली होती, की तो शरणागती फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या समोरास पत्करेल आणि मुख्यमंत्र्यांनीही आज त्यांचे सर्व प्रमुख कार्यक्रम बाजूला ठेवले आणि जो शब्द भूपतीला दिला होता, तो शब्द आज मुख्यमंत्र्यानी गडचिरोलीला येऊन पाळला आहे.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचं पालकमंत्री पद सोडल
इंद्रनील नाईक गोंदियाचे नवीन पालकमंत्री
अजित पवार यांची वरळी येथे पार पडलेल्या जिल्हाध्याकक्षांच्या बैठकीत घोषणा
काही दिवसांपूर्वी नागपूर येथील पक्षाच्या शिबिरात प्रफुल पटेल यांनी पालकमंत्री जिल्ह्यात येत नाही केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला येतात अशी टीका केली होती
शरद पवार आजच्या महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळा सोबत जाणार नाहीत
शरद पवार आज पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार पुण्याला जाणार
थोड्याच वेळात शरद पवार पुण्यासाठी रवाना होणार
मंगळवारी शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, रईस शेख, प्रकाश रेड्डी या महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली होती
मंगळवारी चर्चा अपुरी राहिल्यामुळे आज पुन्हा मुख्य निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक अधिकारी यांच्या सोबत बैठक होणार आहे
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट
सकाळपासूनच जिल्हा ढगाळ वातावरण; जिल्ह्याला पुन्हा पाऊस झोडपणार?
छत्रपती संभाजीनगर सह मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट
मराठवाड्यातला शेतकरी अतिवृष्टीतून सावरत असतानाच पुन्हा पावसाचे संकट
आभाळात ढग दाटल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट
सकाळपासूनच जिल्हा ढगाळ वातावरण; जिल्ह्याला पुन्हा पाऊस झोडपणार?
छत्रपती संभाजीनगर सह मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट
मराठवाड्यातला शेतकरी अतिवृष्टीतून सावरत असतानाच पुन्हा पावसाचे संकट
आभाळात ढग दाटल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली
Chhatrapati Sambhajinagar Crime : आमलेटच्या दुकानावर काम करणाऱ्या ३० वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची खळबळ ज्या घटना उघडकीस आली आहे. जालना रोड वरील एसएफएस शाळेच्या मैदानावर ही घटना उघडकीस आली आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.सुरेश भगवान उंबरकर वय ३० राहणार कैलास नगर असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. सुरेश उंबरकर यांचा खून नेमका कोणी केला? खून करण्यामागचा उद्देश काय होता? ओळखीच्यांनी खून केला असल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास जवाहरनगर पोलीस करीत आहेत.
Bhandara News : भंडारा जिल्ह्यात शून्य पटसंख्या असलेली एकही शाळा नसून सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश घेतल्याचा भंडारा जिल्हा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. ही भंडारा जिल्ह्यासाठी गौरवास्पद बाब असली तरी, दुसरीकडे जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये जवळपास 800 शिक्षकांची पद रिक्त असल्याची चिंताजनक बाब आहे. दिवाळीपूर्वीचं जिल्हा परिषद शाळांचं पहिलं सत्र संपायला आलय. जिल्हा परिषद भंडाऱ्याच्या अखत्यारीत असलेल्या इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या 793 शाळांमध्ये सुमारे 75 हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाराष्ट्रात बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क लागू असताना भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये मात्र शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पूर्वी शिक्षकांची भरती प्रक्रिया जिल्हा परिषद प्रशासन राबवित होती. मात्र, कालांतराने यात राज्य सरकारने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया राबवणे सुरू केले तेव्हापासून शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न उपस्थित झाला असून दिवाळीनंतरच्या सत्रात राज्य सरकारने भंडारा जिल्हा परिषदची सर्व रिक्त पदे नं भरल्यास जिल्हा परिषदच्या सर्व शाळा बंद करण्याचा इशारा जिल्हा परिषद शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांनी राज्य सरकारला दिलाय.
उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी चिंचवड मध्ये पोहोचले...
पिंपरी चिंचवडच्या पिंपळे सौदागर येथील रस्त्याची पाहणी केली
रस्त्याचं काम अर्धवट राहिल्यानं, ते पूर्ण कसा करता येईल, या दृष्टीने अजित पवार अधिकाऱ्यांकडून माहिती घेतायेत
क्राॅफर्ड मार्केटमधील पशु-पक्षांचे खाद्यविक्री दुकानाला रात्री २ च्या सुमारास आग लागल्याची घटना समोर
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल
मध्यरात्री ४ वा आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश
शाॅर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे
मात्र या आगीत दुकानातील सामानाचे मोठे नुकसान झाले आहे
फौजदार असल्याच्या थापा मारून लग्नाचे आमिष दाखवत मुलींना फसवणाऱ्या भामट्यास अटक
मॅटरीमॉनियल ऍपवर खोटा बायोडाटा टाकून फसवणाऱ्या तरुणाला सोलापूर सायबर पोलिसांनी केली अटक
वैभव दीपक नारकर असे 31 वर्षीय तरुणाचे नाव, आतापर्यंत 8 तरुणीची फसवणूक केल्याचे उघड
वैभव याने लग्न जुळवणाऱ्या एका ऍपवर स्वतः पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगितले
बनावट बायोडाटा आणि वर्दी घातलेले फोटो बनावट फोटो टाकत पोलीस उपनिरीक्षक असल्याचे भासवत केली मुलींची फसवणूक
तसेच विवाहइच्छुक मुलींशी ओळख वाढवून त्याना वेगवेगळे कारण सांगत त्यांच्याकडून पैसे उकळले
याशिवाय आपण मंत्रालयात नोकरीला असून 40-50 जणांना नोकरीचे आमिष दाखवत फसवल्याचे देखील चौकशीत समोर आलंय
दरम्यान या प्रकरणी आर्थिक फसवणूक झालेल्या एका मुलीने सोलापूर सायबर पोलिसात तक्रार दाखल केली होती
तांत्रिक गोष्टींचे विश्लेषण केल्यानंतर पोलिसांनी आरोपी वैभव नारकर याला मुंबईतून अटक केलीय
फौजदार असल्याच्या थापा मारून लग्नाचे आमिष दाखवत मुलींना फसवणाऱ्या भामट्यास अटक
मॅटरीमॉनियल ऍपवर खोटा बायोडाटा टाकून फसवणाऱ्या तरुणाला सोलापूर सायबर पोलिसांनी केली अटक
वैभव दीपक नारकर असे 31 वर्षीय तरुणाचे नाव, आतापर्यंत 8 तरुणीची फसवणूक केल्याचे उघड
वैभव याने लग्न जुळवणाऱ्या एका ऍपवर स्वतः पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगितले
बनावट बायोडाटा आणि वर्दी घातलेले फोटो बनावट फोटो टाकत पोलीस उपनिरीक्षक असल्याचे भासवत केली मुलींची फसवणूक
तसेच विवाहइच्छुक मुलींशी ओळख वाढवून त्याना वेगवेगळे कारण सांगत त्यांच्याकडून पैसे उकळले
याशिवाय आपण मंत्रालयात नोकरीला असून 40-50 जणांना नोकरीचे आमिष दाखवत फसवल्याचे देखील चौकशीत समोर आलंय
दरम्यान या प्रकरणी आर्थिक फसवणूक झालेल्या एका मुलीने सोलापूर सायबर पोलिसात तक्रार दाखल केली होती
तांत्रिक गोष्टींचे विश्लेषण केल्यानंतर पोलिसांनी आरोपी वैभव नारकर याला मुंबईतून अटक केलीय
धाराशिवची पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी कुटुंबासह पूरग्रस्तांसोबत दिवाळी साजरी केली. महापुरात पाण्याच्या विळख्यात अडकलेल्या गावाला सरनाईक यांनी भेट दिली होती. भूम तालुक्यातील त्याच साडेसांगवी गावात कुटुंबासह जात सरनाईक यांनी गावकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. पत्नी मुलं सुना नातवंड असं परिवारासह सरनाईक साडेसांगवीत पोहोचले. यावेळी गावकऱ्यांना दिवाळीसाठी आकाश कंदील फटाके दिवाळीचे किट वाटप करण्यात आलं. सोबतच गावातील प्रत्येक कुटुंबाला पाच हजारांची मदतही देण्यात आली. भविष्यात गावाला पुराचा धोका उद्भवू नये यासाठी दोन पुलांची उंची वाढवण्यासाठी सूचना करण्यात आल्या. तसेच दोन पूल आणि गावाला जोडणारा रस्त्याच्या कामाचंही भूमिपूजन करण्यात आलं. पुढील पावसाळ्या अगोदर हे सर्व काम पूर्ण होईल असा शब्द यावेळी पालकमंत्र्यांनी गावकऱ्यांना दिला. ही दिवाळी कायम आमच्या लक्षात राहील. माझ्या कुटुंबाप्रमाणेच गावकऱ्यांची दिवाळी व्हावी म्हणून भेट दिल्याचं सरनाईक म्हणाले. प्रताप सरनाईक यांच्या पत्नी यांनीही गावकऱ्याबरोबर दिवाळी साजरी करत आनंद व्यक्त केला.
सीना नदीला आलेल्या महापुराने सोलापुरात अनेकांचं सर्वस्व वाहून नेलं. त्यात विद्यार्थ्यांची दप्तरं, पुस्तके देखील गेली. या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाशी जोडण्यासाठी कोल्हापुरातील लोकराजा ऊर्जा मैत्री परिवाराने 500 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं. सोशल मीडियावर आवाहन करत या तरुणांनी पावणे तीन लाख रुपयांचा निधी गोळा केला आणि या रकमेतून स्कूल बॅग, वह्या, पेन, पेन्सिल अशी आवश्यक शैक्षणिक साहित्य पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दिलं. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या तालुक्यातील गावामध्ये विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक साहित्य देण्यात आलं. दरम्यान यावेळी पूरग्रस्त गावातील महिलांना साड्या आणि सॅनेटरी नॅपकिन्स देखील संस्थेच्यावतीने देण्यात आले.
मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा आज जन्मदिवस. आजचा हा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून देखील ओळखला जातो. आजच्या दिवसानिमित्त कोकणातली ही बातमी. रत्नागिरी जिल्ह्यातल्या धामणसे गावामध्ये वाचन संस्कृती जपावी आणि वाढावी यासाठी ग्रंथालय चालवले जातेय. या ग्रंथालयाला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. दुर्गम आणि ग्रामीण भागात असलेल्या ग्रंथालयामध्ये तब्बल 21 हजारहुन जास्त पुस्तक आहेत. कवितासंग्रह, कथा आणि कादंबऱ्या तसेच विविध ग्रंथ यासह स्पर्धा परीक्षांसाठी लागणारि पुस्तके देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होतोय. तंत्रज्ञानाच्या या जमान्यामध्ये वाचन संस्कृती जपावी आणि ती वाढावी यासाठी प्रयत्न देखील केला जातोय. त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळतोय.
कोकणात सध्या भात कापणीचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र तळकोकणातील मडूरा गावात ओंकार हत्तीने धुडगुस घातल्याने भात कापणी ठप्प झाली आहे. ओंकार हत्ती भातशेती आणि वाड्या वस्तीत फिरत असल्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकरी भीतीच्या छायेखाली आहेत. ज्ञानेश परब हे शेतकरी भातशेती कापणीसाठी गेले असता त्यांच्यासमोरच हत्ती आल्याने त्यांची तारांबळ उडाली. वनविभाग केवळ बघ्याचीच भूमिका घेतल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. त्यामुळे वनविभागा विरोधात स्थानिक शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. येत्या चार दिवसात हत्ती पकड मोहीम न राबविल्यास संपूर्ण गावातील भातशेतीला सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतेय. ओंकार हत्ती गेल्या आठ दिवसांपासून मडूरा गावातच ठाण मांडून असल्यामुळे भातशेती कापणीची काम ठप्प झाली आहेत. येत्या आठ दहा दिवसात भात कापणी न झाल्यास भातपीक वाया जाणार आहे,
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- राजकारण
- Maharashtra Live Updates: उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूका रद्द करा; निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय काय घडलं?