Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

पार्श्वभूमी
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमला बागची आणि व्ही मोहना यांच्या विशेष खंडपीठासमोर पार पडणार आहे..शिवसेना...More
माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवर टांगती तलवार कायम
मणिकरावांच्या शिक्षेविरोधातील अपीलावर सहा महिन्यात निर्णय करण्याचे उच्च न्यायालयाला निर्देश
सहा महिन्यानंतर विधानसभा अध्यक्ष आमदारकी रद्द करण्याची कार्यवाही सुरू करू शकतात
उच्च न्यायालय निर्णय करेपर्यंत सहा महिन्यांपर्यंत माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात आमदार अपात्रतेची कारवाईला स्थगिती
परंतु लाभाचे पद उदा- मंत्रीपद , महामंडळ अध्यक्ष - सदस्य पद घेण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून मनाई कायम
आज सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे
फाऊंटन हॉटेलसमोर चितळाला अज्ञात वाहनाची धडक; उपचारासाठी नेत असताना मृत्यू
मिरा-भाईंदर : ठाणे-घोडबंदर रोडवरील फाऊंटन हॉटेलसमोर रविवारी २ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास एका अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, चितळ रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. धडकेनंतर चितळ बेशुद्ध अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेला होता.
घटनेची माहिती मिळताच वन कर्मचारी पवन शर्मा यांच्या पथकासह संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली येथील वन कर्मचारी दिनेश गुप्ता घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी चितळाला वन विभागाच्या वाहनातून उपचारासाठी नेले.
मात्र, उपचारासाठी नेत असताना चितळाचा मृत्यू झाल्याची माहिती वन विभागाकडून मिळाली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुतळ्याला जोडे मारत आंदोलन करून पुतळ्याचे दहन करण्यात आलं.. पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. बारामतीतील भिगवण चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली।
D Y Patil passes away: देशातील महत्त्वाच्या शिक्षणसंस्थांचे प्रणेते, माजी राज्यपाल आणि पद्मश्री पुरस्कार विजेते ज्ञानदेव यशवंतराव पाटील अर्थात डी. वाय. पाटील यांचे कोल्हापूरमध्ये निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 22 ऑक्टोबर 1935 रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी महाराष्ट्रात शिक्षणमहर्षी या उपाधीने ओळखले जात होते. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात मोठे साम्राज्य उभारले होते. डी.वाय. पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. मात्र, काही काळानंतर त्यांनी सक्रिय राजकारणापासून बाजूला होत आपले पूर्ण लक्ष शिक्षण क्षेत्रावर केंद्रित केले होते.
शहापूरच्या सापगाव पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य; संतप्त नागरिक थेट खड्ड्यात उतरले आंदोलनासाठी
शहापूर तालुक्यातील भातसा नदीवरील सापगाव पुलाची अक्षरशः चाळण; मोठमोठ्या खड्ड्यांमुळे प्रवास धोकादायक.
समृद्धी महामार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा पूल असल्याने दररोज हजारो वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
खड्डे चुकवताना बस, ट्रक आणि इतर मोठ्या वाहनांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर जवानाचा मृत्यू झाल्यानंतरही महामार्गसह शहापूरमधील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था कायम असल्याने नागरिक संतप्त.
खड्डे तातडीने बुजवून पुलाची दुरुस्ती करावी, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची भीती
नदी पुनरुज्जीवनासाठी राज्य सरकारकडून कंपनीची स्थापना
महाराष्ट्र राज्य पुनरुज्जीवन परिषद असे कंपनीचे नाव असणार
कंपनी कार्य मंत्रालयाने राज्य सरकारला कळवलं
राज्य सरकारकडून जागतिक स्तरावरील संस्थांकडून नदी पुनरुज्जीवनासाठी निधी उभारणीचा मार्ग मोकळा
पहिल्या टप्प्यात राज्य सरकारचा जवळपास ४ हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा मानस
नदी पुनरुज्जीवनासाठी डीपीआर आणि खोरे व्यवस्थापन आराखड्यांना मंजुरी देणे, अतिक्रमण, जमीन संपादन यांसारख्या समस्यांचे निराकरण करणे, राष्ट्रीय योजनांसाठी निवडक प्रकल्पांची शिफारस करणे इत्यादी महत्त्वाची कामे केली जाणार
कंपनीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री तर पर्यावरण मंत्री उपाध्यक्ष असणार
पर्यावरण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यकारी समिती कार्यरत असणार
या समितीत तांत्रिक तज्ज्ञ, आर्थिक आणि कायदेशीर सल्लागार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) सदस्य सचिव तसेच आयआयटीसारख्या संस्थांमधील तज्ज्ञ सदस्यांचा समावेश
राज्यातील नद्यांचे शाश्वत पुनरुज्जीवन साध्य करण्यासाठी ही कंपनी व्यापक काम करणार
दैनंदिन कामकाजासाठी एमपीसीबीच्या सदस्य सचिवांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र सचिवालयही स्थापन करण्यात येणार
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये पाणीसाठा समाधानकारक पातळीवर पोहोचला आहे. आज (४ ऑगस्ट) सकाळी ६ वाजेपर्यंत सात तलावांमध्ये एकूण १२ लाख ९५ हजार ९८२ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा झाला असून, तो एकूण उपयुक्त साठ्याच्या ८९.५४ टक्के
मुंबईला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावात ८७.६४ टक्के, अप्पर वैतरणामध्ये ८०.५३ टक्के, मिडल वैतरणामध्ये ९१.०५ टक्के, तर तानसा तलावात ९९.१४ टक्के पाणीसाठा आहे. मोडकसागर, विहार आणि तुळशी हे तिन्ही तलाव शंभर टक्के भरले असून ते आधीच ओव्हरफ्लो झाले आहेत.
आज राज्यभरातील इंडियन मेडिकल कॉन्सिलच्या 50 हजार खाजगी डॉक्टरांचा एक दिवसाचा लाक्षणिक संप ..
आपत्कालीन सेवा वगळता खाजगी डॉक्टरांची वैद्यकीय सेवा आज सकाळी 6 वाजता पासून पुढील 24 तासासाठी बंद ...
होमीओपॅथी डॉक्टरांना सीसीएमपी कोर्स च्या आधारावर महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिल मध्ये नोंद हवी आहे. मात्र इंडियन मेडिकल असोशिएशन(IMA ) ला प्रस्तावित नोंदणीला घेऊन विरोध आहे ..
जर होमीओपॅथी डॉक्टरांची नोंद होमीओपॅथी काउंसिल मध्ये असतांना परत महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये नोंद करून दुहेरी नोंद कशासाठी ? हा इंडियन मेडिकल असोशिएशन च्या डॉक्टरांचा सरकारला प्रश्न आहे ?
मॉडर्न मेडिसिन व होमीओपॅथी दोन वेगवेगळ्या आहे. त्यांची प्रॅक्टिस पद्धती वेगवेगळी आहे तर मग ते महाराष्ट्र मेडिकल काउंसिल नोंद कशासाठी हा देखील आंदोलक डॉक्टरांचा आक्षेप आहे
पुणे आणि पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यात 1 सप्टेंबरपासून रिक्षा भाडेवाढ होण्याची शक्यता आहे
भाडेवाढीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या समोर ठेवण्यात आलाय.
पुण्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (RTA)ने हा प्रस्ताव ठेवला
त्यानुसार पहिल्या दिड किलोमीटर साठी किमान भाडे 25 रुपये ऐवजी 30 रुपये इतकी भाडे वाढ सुचवण्यात आलेली आहे.
प्रति किलोमीटर चा दर हा १७ वरून २० रुपये करण्यात येणार आहे
सीएनजी, पेट्रोल दरवाढ आणि मेंटेनन्सचा खर्च वाढल्याने या भाडेवाढीला मंजुरी मिळणार, हे उघड आहे
1 सप्टेंबर पासून ही भाडेवाढ लागू होण्याची शक्यता आहे
CCMP अहर्ता प्राप्त BHMS डॉक्टरांच्या नोंदणीशी संबंधित शासन आदेश जारी.
कार्यक्षमता, हाताळणी निष्काळजीपणा यावर SOP निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्याचा आदेश जारी.
राज्यात आता आगामी काळात आधुनिक वैद्यक पद्धत अर्थात एमबीबीएस व होमिओपॅथी डॉक्टरांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण होऊ शकते..? शासनाने सीसीएमपी आहताधारक होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यक परिषदेत स्वतंत्र नोंदणी वहीत नोंद करण्यासाठी एक पाऊल उचललं असून कालच एक शासन आदेश जारी करत, सी सी एम पी आहर्ता प्राप्त BHMS डॉक्टरांच्या नोंदणी शी संबंधित कार्यक्षमता, निष्काळजीपणा व कार्यपद्धती यावर नैतिक चौकट निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे लवकरच सीसीएमपी आहारताप्राप्त होमिओपॅथी डॉक्टरांची आता महाराष्ट्र वैद्यक परिषदेत नोंदणी होणार असल्याचा समोर आला आहे यामुळे मात्र आधुनिक वैद्यक शास्त्राच्या डॉक्टरांच्या संघटना मात्र आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहे आणि त्यामुळे आगामी काळात एमबीबीएस विरुद्ध बीएचएमएस असा संघर्ष आपल्याला डॉक्टरांचा बघायला मिळेल. यापूर्वीच आधुनिक वैद्यक शास्त्राच्या डॉक्टरांची संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात या नोंदणी विरोधात याचिका दाखल केलेली आहे.
धारावीनंतर आता मिठी नदीच्या विकासाची जबाबदारीही अदानी समूहाकडे
धारावी पुनर्विकासासोबत ३.३ किमी लांबीचा मिठी नदी वॉटरफ्रंट विकसित होणार.
माटुंगा कल्व्हर्टपासून नदीकिनारी सार्वजनिक प्रोमेनेड उभारला जाणार
पादचारी आणि सायकलस्वारांसाठी १५ मीटर रुंदीचा ‘ग्रीन स्पाईन’ तयार होणार
नदीकिनारी कॅफे, व्ह्यूइंग डेक, सांस्कृतिक जागा आणि स्थानिक वृक्षांची लागवड केली जाणार.
प्रकल्पांतर्गत सुमारे ४० हजार वृक्षांचे संवर्धन, तर भरपाई म्हणून एमएमआरमध्ये जवळपास २ लाख वृक्षांची लागवड करण्याचा दावा
हा प्रकल्प धारावी पुनर्विकासाचा भाग म्हणून ANDPL अदानी नवभारत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड राबवणार
कांदिवलीत मोठी दुर्घटना टळली; पार्किंगच्या पहिल्या मजल्यावरून कार खाली कोसळली
मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील चारकोप परिसरातील होरायझन इमारतीत मोठी दुर्घटना टळली. इमारतीच्या कार पार्किंगच्या पहिल्या मजल्यावरून एक कार अचानक खाली कोसळली.
या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने घटना घडली त्यावेळी खाली कोणीही उपस्थित नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
माहिती मिळताच संबंधित अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. कार पार्किंगमधून खाली कशी कोसळली आणि या अपघातामागील नेमके कारण काय, याचा तपास सध्या सुरू आहे.
महापौरांची घोषणा हवेतच?साकीनाका मॅनहोल दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबीयांना १० लाखांच्या मदतीची अजूनही प्रतीक्षा कायम
२ जुलैच्या साकीनाका मॅनहोल दुर्घटनेला महिना पूर्ण.
मृत असलम शेख यांच्या कुटुंबीयांना जाहीर केलेली १० लाखांची मदत अद्याप मिळालेली नाही.
महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन मदतीची घोषणा केली होती.
घोषणेनंतर महापौरांकडून कोणताही पाठपुरावा नसल्याचा कुटुंबीयांचा आरोप
दुर्घटनेचा चौकशी अहवालही अद्याप जाहीर झालेला नाही.
घोषणा केली मात्र पाठपुरावा कधी ?पर्सनल पीए च्या मानधनाचा पाठपुरावा होतो अशा कडक शब्दात विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांची सडकून टीका
महापौरांनी घोषणा केली … पण मदत कधी? साकीनाका दुर्घटनेतील पीडित कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत.
- वाढत्या ध्वनी प्रदूषणावर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाची गंभीर दखल.
- पोलिसांनी केलेल्या कारवाईचा तपशील २५ ऑगस्टपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे पोलिस आयुक्तांना आदेश.
- न्यायमूर्ती ऊर्मिला जोशी-फाळके आणि न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांनी पोलिसांच्या उपाययोजनांची विचारणा केली.
- ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारींसाठी मनपाने एकात्मिक डिजिटल प्रणाली व स्वतंत्र वेबसाईट सुरू केल्याची माहिती.
- ऑनलाइन तक्रार दाखल होताच संबंधित पोलिस अधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे ती थेट पाठवली जाणार.
- मनपाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालकांची 'नोडल अधिकारी' म्हणून नियुक्ती.
- त्रिमूर्ती नगर परिसरातील ध्वनी प्रदूषणाविरोधात दाखल जनहित याचिकेवर सुनावणी.
- कोर्ट मित्र अॅड. अब्दुल सुभान यांनी ध्वनी प्रदूषणासंदर्भातील व्हिडिओ क्लिप न्यायालयात सादर केली.
मुंबईतील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेची ३.८५ कोटींची तरतूद
खड्डेमुक्त मुंबईच्या दाव्यानंतरही… खड्डे कमी झाल्याचा दावा… पण दुरुस्तीसाठी पुन्हा ३.८५ कोटींचा प्रस्तावस्थायी समितीमध्ये चर्चिला जाणार
शहर विभागातील खड्डे बुजविण्यासाठी ३ कोटी ८५ लाख रुपयांचा प्रस्ताव.
मार्च २०२७ पर्यंत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे महापालिकेचे नियोजन.
परिमंडळ-१ मधील ए, बी, सी, डी आणि ई विभागातील रस्त्यांवर काम होणार.
९ मीटरपेक्षा रुंद रस्त्यांवरील खड्डे मास्टिक तंत्रज्ञानाने बुजविण्यात येणार.
अकोल्याच्या बाळापूरमधून मोठी बातमी आहेय. एका पोलीस कर्मचाऱ्याने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणात मोठी अपडेट समोर आलीय. अखेर अत्याचार करणाऱ्या आरोपी पोलीस कर्मचारी पवन वडगावेला नांदेडमधून अटक झालीय. त्याने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहेय. मात्र, अत्याचाराच्या घटनेनंतर पीडित मुलीने टोकाचा निर्णय घेत गळफास लावत आत्महत्या केली होतीय. गुन्हा दाखल झाल्यानंतर गेल्या 22 दिवसांपासून आरोपी पोलिस कर्मचारी पवन फरार होता. त्याच्या अटकेसाठी पीडित कुटुंबीयांच्या नातेवाईकांसह गावकऱ्यांनी मुलीच्या मृतदेहासह बाळापुरातील अकोला नाका रस्त्यावर रास्ता रोका केला होताय. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या नराधम पोलिस कर्मचारी पवन वडगावे अखेर नांदेडमधून अटक झालीय. सलग 20 दिवस आरोपीचा मागावर असलेल्या पोलिसांनी हैद्राबाद (तेलंगणा), कोईम्बतुर (तामीळनाडू), बंगलोर (कर्नाटक), मुंबई, नांदेड, हिंगोली या ठिकाणी आरोपीच्या नातेवाईक व मित्रांकडे त्याचा शोध घेतला. परंतु आरोपी मिळून येत नव्हता. तसेच आरोपी हा मोबाईल, सोशल मिडीया माध्यमांचा वापर करत नसल्याने त्याचा ठावठिकाणा मिळणे व त्याचा नेमका शोध घेणे अत्यंत कठीण जात होते. मात्र, आरोपीच्या नातेवाईक व मित्रांवर लक्ष ठेवून तसेच तांत्रीक व गोपनिय माहीतीवरून आरोपी पवन वडगावे अखेर नांदेडमध्ये हाती लागलाय.
तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ४० हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक आणि पोलिस शिपाईविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस उपनिरीक्षक साईनाथ भगवानदास तळेकर (वय ३६) आणि पोलिस शिपाई अविनाश अरविंद सादरे (वय ३१) यांनी तक्रारदाराच्या नातेवाईकांशी संबंधित प्रकरणात न्यायालयात अनुकूल अहवाल पाठविण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. पडताळणीत मागणी निष्पन्न झाल्यानंतर ४० हजार रुपयांवर तडजोड झाली. एसीबीने सापळा रचला असता पोलिस शिपाई अविनाश सादरे यांनी तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यावेळी त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी धुळे शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- राजकारण
- Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी