Maharashtra Live News: विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी, 11 जागांसाठी मतदारांचा कौल आज मतपेटीत कैद होणार, मतदानाला सुरुवात
Maharashtra Live News: राज्यातल्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे.

पार्श्वभूमी
Maharashtra Live News: राज्यातल्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान (Vidhan Parishad Election 2026) पार पडणार आहे. मतदानाची औपचारिकता पार पडण्यापूर्वीच महायुतीने मोठा राजकीय 'मास्टरस्ट्रोक' लगावला आहे. या अकरापैकी तब्बल सहा जागांवर...More
शिवसेना ठाकरे गटाचे फुटलेले सहा खासदार आज संध्याकाळी मुंबईमध्ये दाखल होणार आहे
मुंबईचा गोरेगाव पश्चिम द्रुतगती महामार्ग ला लागत असलेला वेस्टीन हॉटेलमध्ये या सर्व खासदारांना ठेवला जाणार आहे
हे सर्व खासदार आज याच वेस्टीन हॉटेलमध्ये मुक्कामी असणार आहेत
उद्या गोरेगाव नेस्को सेंटर मध्ये शिवसेना शिंदे गटाकडून 600वर्धापन दिवस साजरा केला जाणार आहे
या वर्धापन दिवस कार्यक्रमांमध्ये सर्व 6 खासदारांचे पक्षप्रवेश शिंदे गटात होणार आहे
नेस्को सेंटर शेजारी वेस्टीन हॉटेल असल्यामुळे सर्व खासदारांना आता गोरेगाव मध्ये संध्याकाळी सहाच्या नंतर आणला जाणार आहे
खासदारांसाठी वेस्टीन हॉटेलमध्ये रूम बुक करण्यात आला आहे
ठाकरे गटाला पालिकेत आणखी एक मोठा धक्का
अपात्रतेची प्रत महापालिकेकडे दाखल
आज महापालिका सभागृहात दीपक सावंत यांच्या अपात्रतेची घोषणा होणार
ठाकरेंच्या सेनेची ६५ वरून ६४ संख्या होणार
जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर ही कारवाई होणार
कुणबी आरक्षित जागेवरून निवडून आले होते
जात पडताळणी समितीने कुणबी दावा फेटाळला
भांडुपमधील जागा रिक्त होण्याचा मार्ग मोकळा
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये खाजगीकरणाचा घाट घातला जातोय. पण या खाजगीकरणाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी यांनी हिरवा कंदील दाखवलाय. पालकांसह विद्यार्थ्यांची खाजगी शाळांमध्ये शिकण्याची मानसिकता आहे. त्यामुळं शासकीय शाळांमधील पट दिवसेंदिवस कमी होत चाललाय. अशा परिस्थितीत खाजगी संस्थांना शाळा चालवायला देणं योग्य ठरेल. फी मधून पालकांची लूट होणार नाही, अशी अट टाकून पालिका फी स्ट्रक्चर ठरवत असते. असा दावा पाटलांनी केला.
भंडारा-गोंदिया जिल्हा विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधारी सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ही निवडणूक सर्वसामान्य जनतेची गळचेपी करणाऱ्या आणि माज आलेल्या सरकारविरोधात आहे, अशी घणाघाती प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. नाना पटोले पुढे म्हणाले की, सध्याच्या सरकारच्या शब्दकोशातून शेतकरी हा शब्दच गायब झाला आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करणे आणि त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणे, हेच या सरकारचं धोरण बनल आहे. याशिवाय, देशातील वाढत्या महागाईनं आकाश गाठले असून, तरुणांच आयुष्य उद्ध्वस्त करण्याच काम हे सरकार करत आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रशासकीय दबावाचा वापर केला जात असल्याचा आरोप करत पटोले म्हणाले, "या सरकारचा अहंकार इतका वाढला आहे की त्यांनी आमचे उमेदवार नरेश ईश्वरकर यांच्या घरावर तब्बल १५० पोलिसांचा फौजफाटा पाठवला. पोलिसांचा दबाव आणून त्यांच्यावर खोट्या कारवाया करण्याचा प्रयत्न केला. हे पूर्णपणे 'जंगलराज' असून या दडपशाही विरोधातच आमचा हा लढा आहे. चमत्कारिक विजयाचा विश्वास या हुकूमशाही आणि जंगलराजाला चोख उत्तर देण्यासाठीच आम्ही नरेश ईश्वरकर यांना उमेदवारी दिली आहे. स्थानिक मतदार आणि जनता या दडपशाहीला भीक घालणार नाही, त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नरेश ईश्वरकर यांचा 'चमत्कारिक विजय' होईल, असा ठाम विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
भंडारा-गोंदिया जिल्हा विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधारी सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ही निवडणूक सर्वसामान्य जनतेची गळचेपी करणाऱ्या आणि माज आलेल्या सरकारविरोधात आहे, अशी घणाघाती प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. नाना पटोले पुढे म्हणाले की, सध्याच्या सरकारच्या शब्दकोशातून शेतकरी हा शब्दच गायब झाला आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करणे आणि त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणे, हेच या सरकारचं धोरण बनल आहे. याशिवाय, देशातील वाढत्या महागाईनं आकाश गाठले असून, तरुणांच आयुष्य उद्ध्वस्त करण्याच काम हे सरकार करत आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रशासकीय दबावाचा वापर केला जात असल्याचा आरोप करत पटोले म्हणाले, "या सरकारचा अहंकार इतका वाढला आहे की त्यांनी आमचे उमेदवार नरेश ईश्वरकर यांच्या घरावर तब्बल १५० पोलिसांचा फौजफाटा पाठवला. पोलिसांचा दबाव आणून त्यांच्यावर खोट्या कारवाया करण्याचा प्रयत्न केला. हे पूर्णपणे 'जंगलराज' असून या दडपशाही विरोधातच आमचा हा लढा आहे. चमत्कारिक विजयाचा विश्वास या हुकूमशाही आणि जंगलराजाला चोख उत्तर देण्यासाठीच आम्ही नरेश ईश्वरकर यांना उमेदवारी दिली आहे. स्थानिक मतदार आणि जनता या दडपशाहीला भीक घालणार नाही, त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नरेश ईश्वरकर यांचा 'चमत्कारिक विजय' होईल, असा ठाम विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
ठाकरे गटाचे बंडखोर खासदार संजय जाधव यांना मिळणार Y प्लस सुरक्षा दिली जाणार; गृह विभागाने पोलीस अधीक्षकांना दिले आदेश
दिल्लीत शिवसेना ठाकरे गटाच्या संसदीय बैठकीत आतापर्यंत कोणकोण पोहोचले?
संजय राऊत
अरविंद सावंत
अनिल देसाई
राजाभाऊ वाजे
मुंबई - महापालीकेतील 20 पेक्षा जास्त नगरसेवक शिंदेच्या संपर्कात - शिंदचे नगरसेवक किरण लांडगेचा दावा
शिवसेना युबिटी चे सहा खासदार फुटल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेत मिशन टायगर?
२० पेक्षा जास्त नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात आहे, केव्हा निर्णय घ्यायचा आहे अशी विचारणा ह्या नगरसेवकांकडून केली जात आहे.
लवकरच त्याविषयी निर्णय घेण्यात येईल.
हे २० नगरसेवक शिवसेनेत सामील झाल्यावर पालिकेत शिवसेनेची संख्या वाढेल असे शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक किरण लांडगे यांचा दावा
विरार : अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) वसई-विरार परिसरातील सुरू असलेल्या धडक कारवायांमुळे हॉटेल चालक, किराणा दुकानदार व खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अशातच कारवाईच्या भीतीपोटी डिसेंबर २०२५ रोजी मुदत संपलेले खाद्यपदार्थ आणि बुरशी लागलेले नूडल्स मोठ्या प्रमाणात रस्त्यालगत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार आगाशी रोड, विरार पश्चिम परिसरात उघडकीस आला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शेकडो बटरची पाकिटे, मुदतबाह्य खाद्यसाहित्य तसेच बुरशी लागलेले नूडल्स आणि इतर वस्तू कचऱ्यासोबत उघड्यावर टाकण्यात आल्या आहेत. संबंधित खाद्यपदार्थ मानवी आरोग्यास अत्यंत घातक ठरू शकतात. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून असे पदार्थ विक्रीसाठी ठेवले जात असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. अलीकडेच अन्न व औषध प्रशासनाने वसई-विरार परिसरातील विविध हॉटेल्स, गोदामे आणि दुकानदारांवर धाडी टाकून कारवाई केली आहे. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले असून कारवाई टाळण्यासाठीच हा साठा गुपचूप रस्त्यावर फेकण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नागरिकांनी सांगितले की, रस्त्यावर फेकून दिलेले हे खाद्यपदार्थ गायी, म्हशी, कुत्रे, पक्षी व इतर भटक्या प्राण्यांनी खाल्ल्यास त्यांना विषबाधा होऊन मृत्यूही होऊ शकतो. यामुळे सार्वजनिक आरोग्यासह पर्यावरणालाही गंभीर धोका निर्माण झाला आहे.
दिल्लीत झाल ते राज्यात होईल, राज्यात देखील ऑपरेशन टायगर होणार नारायण कुचे यांचा दावा ..
संजय राऊत याला हमीभाव कसं काय माहित, त्याना घेतले नाही तर त्याला भाव कसा माहीत, तो देखील सामील असेल. त्याने तर सरकार घातला आहे मागचं...
संजय राऊत डोक्यावर उलटे पडले म्हणून काहीही बोलायला लागले
उद्धव ठाकरे यांना 2029 मध्ये निवडणुकीसाठी उमेदवार मिळणार नाही अशी त्यांची परिस्थिती आहे
2024 म्हणजे उद्धव ठाकरे यांची शेवटची निवडणूक होती, भाजप आमदार नारायण कुचे यांचा ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
संजय राऊत यांनीच मागचं(ठाकरे सरकार)सरकार घातलेला आहे आमदार नारायण कुचे
भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीची रंगत आता वाढल्याचे चित्र भंडाऱ्यात बघायला मिळत आहे. भंडारा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या मतदान केंद्रावर महायुतीच्या मतदारांची पहिली ट्रॅव्हल्स पोहोचलेली आहे. या मतदारांमध्ये भंडारा आणि तुमसर येथील नगरसेवक आणि काही जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश आहे.
शिवसेनेच्या सर्व सहा खासदारांचा रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांच्यासोबत काॅलवर बोलणं झाल्याची सुत्रांची माहीती
सर्व सहा खासदारांसोबत ३० मिनिटं सविस्तर चर्चा
आॅपरेशन टायगर यशस्वीरित्या पार पडलंय, शिवसेना सर्व खासदरांच्या पाठिशी खंबीर ऊभी राहणार असं शिंदेंकडून आश्वासन…
त्यामुळे ठाकरेंचे सहा खासदार आज संसदिय बोर्डाच्या बैठकिला ऊपस्थित राहणार नसल्याची शिवसेना सुत्रांची माहीती
हे सर्व आॅपरेशन गोपनिय पद्धतीने राबवण्याची दिल्लीत श्रिकांत शिंदे यांच्यावर जबाबदारी
आॅपरेशन यशस्वी करण्यासाठी श्रीकांत शिंदे दिल्लीत ठाण मांडून - सुत्र
जून महिना सुरू होऊनही अद्याप पावसाने दडी मारल्याने बीड जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे. जिल्ह्यातील लहान-मोठ्या अशा एकूण 167 धरण प्रकल्पांमध्ये मिळून केवळ 17.25 टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिलाय. जिल्ह्यातील तब्बल 79 लघु प्रकल्प जोत्याच्या खाली गेली असून, 14 पाणी प्रकल्प पूर्णपणे कोरडे ठाक पडले आहेत. तर पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलीय. गतवर्षी मे महिन्याच्याच शेवटला बीड जवळील बिंदुसरा धरणासह इतर पाणी प्रकल्प ओवर फ्लो झाली होती. मात्र यंदा पावसाने दडी मारल्याने बिंदुसरा धरणातील पाणीसाठा कमालीचा घटलाय.
वर्सोवा मध्ये मनसे विभाग अध्यक्षपदी प्रशांत राणे; संदेश देसाईंना डच्चू, समर्थकांमध्ये नाराजी.
मनसेमध्ये संघटनात्मक फेरबदलांना वेग
नवीन तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचा पक्षाचा प्रयत्न
वर्सोवा विधानसभा अध्यक्षपदी प्रशांत राणे यांची नियुक्ती
संदेश देसाई यांच्याकडून पदाची जबाबदारी काढून घेतली
प्रशांत राणे यांच्यावर पक्ष नेतृत्वाचा विश्वास
राणे हे शालिनी ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात
नियुक्तीमुळे वर्सोवा मनसेमध्ये नव्या समीकरणांची चर्चा
संदेश देसाई यांना पदावरून हटवल्याने समर्थकांमध्ये नाराजी
संघटनात्मक बदलांमुळे कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट प्रतिक्रिया
नाराज कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षवाढीसाठी प्रयत्न करण्याचे राणे यांच्यापुढे आव्हान
अमरावती शहर काँग्रेसने अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये तटस्थ राहण्याची घेतली भूमिका...
महानगरपालिकेचे 17 ही नगरसेवक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदान करणार नाही..
काँग्रेसने सगळ्यांही नगरसेवकांना व्हीप जारी करून दिले आदेश...
मात्र यावेळी ग्रामीण मधील काँग्रेसच्या कोणत्याही नगरसेवकांना व्हीप जारी केले नाही..
फुटणाऱ्या खासदारांचा संशय असणाऱ्या खासदारांची मनधरणी करण्यासाठी आणि संपर्क साधण्यासाठी ठाकरेंच्या नेत्याचा प्रयत्न...
ज्या खासदारांच्या नावाची चर्चा सुरु झाल्यापासून संबंधित खासदारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे
यामध्ये मराठवाड्यातील खासदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केला असल्याची सूत्रांची माहिती
मंगळवारी रात्रीपर्यत मराठवाड्यातील खासदारांचा संपर्क अंबादास दानवे यांच्याशी झाला
मात्र कालच्या दिवसात कोणत्याच नेत्यांकडून खासदारांशी संपर्क झाला नसल्याची माहिती
तर ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांना आमदार सचिन अहिर आणि माजी आमदार रमेश कोरगावकर यांच्याकडून वारंवार संपर्क केला जात असल्याची माहिती
संपर्क साधत असलेले नेते थेट उद्धव ठाकरेंना संपूर्ण माहिती देत असल्याची देखील सूत्रांची माहिती...
सोलापूरच्या 70 फूट रोडवरील शिवकुमार ज्वेलर्समध्ये पिस्तुलाचा धाक दाखवून दोन सोन्याच्या नेकलेसची लूट करणाऱ्या टोळीचा शहर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. अक्कलकोट रोड परिसरातून दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून लुटलेले दोन सोन्याचे नेकलेस, देशी बनावटीचे पिस्तूल, 3 जिवंत काडतुसे, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली चोरीची अॅक्सेस दुचाकी असा एकूण सुमारे 6 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अटक केलेल्या आरोपींची नावे जिलानी रफिक दामटे आणि साहिल उर्फ भाई नंदियाल अशी आहेत. या प्रकरणातील तिसरा आरोपी रेहान उर्फ जड्डया लडाफ हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी 250 हून अधिक सीसीटीव्ही फुटेजचे परीक्षण करून तांत्रिक विश्लेषण केले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तिन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून पुणे आणि सोलापूरमध्ये त्यांच्या विरोधात विविध गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाबाबत पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी माहिती दिली.
मुंबईतील एमआयडीसी पोलिसांनी एका कार डिझायनरविरोधात 53 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 15 जून रोजी गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार जयेश ठक्कर, हे ईव्ही क्षेत्रातील कंपनीचे संचालक असून, आरोपी डिझायनरने 2024 मध्ये त्यांच्याशी संपर्क साधत आपल्या दोन मुलांचा कोविडमुळे मृत्यू झाल्याचे सांगून भावनिक विश्वास संपादन केला. त्यानंतर दोघांमध्ये व्यावसायिक भागीदारीचा प्रस्ताव ठेवण्यात आला.
तक्रारीनुसार, आरोपीने दोन इलेक्ट्रिक वाहनांचे मॉडेल विकसित करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच नवीन कंपनी स्थापन करून त्यात आपल्या सुनेला संचालक करण्याचा प्रस्ताव दिला. यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला होता. ठक्कर यांनी 2.5 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास आणि आरोपीला मासिक वेतन देण्यास सहमती दर्शवली होती.
मात्र, वाहनांमध्ये बदल करण्याच्या कामासाठी दिलेली रक्कम कंपनीच्या खात्यात जमा न करता इतरत्र वळवण्यात आल्याचे ठक्कर यांच्या निदर्शनास आले. दोन वाहनांसाठी सुमारे 1.77 कोटी रुपयांचे व्यवहार संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात 53 लाख रुपये आरोपीच्या वैयक्तिक खात्यांमध्ये वळवण्यात आल्याचे समोर आले असून, पुढील तपास सुरू आहे.
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी आज (18 जून ) येवला तहसील कार्यालयात मतदान प्रक्रिया पार पडत असून या मतदान केंद्र क्रमांक पाचमध्ये येवला, मनमाड व नांदगाव येथील 88 नगरसेवक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे..मतदानासाठी प्रशासनाच्यावतीने तयार पूर्ण करण्यात आली आहे..महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा होम ग्राउंड असलेल्या या मतदान केंद्रावर सर्वांचे लक्ष लागले आहे..
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- राजकारण
- Maharashtra Live News: विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी, 11 जागांसाठी मतदारांचा कौल आज मतपेटीत कैद होणार, मतदानाला सुरुवात